शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

निर्बंधाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुली बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST

संदीप भालेराव नाशिक : कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याची गंभीर ...

संदीप भालेराव

नाशिक : कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याची गंभीर बाब लॉकडाऊनच्या काळात समेार आली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारचे १९ प्रकार उघडकीस आले असून या अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. याप्रकरणी वधू-वरांसह पालकांचे समुपदेशन करण्यात आले तर तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणांवरून कमी खर्चात आणि कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह करावा लागत असल्याने ही संधी साधत अनेकांनी अल्पवयीन मुलीच्या विावाहाचे बेत आखल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. मात्र काही जागरूक नागरिकांच्या मदतीने अशा प्रकारचे विवाह रोखण्यात चाईल्डलाईन आणि महिला बालविकास कार्यालयाच्या बाल विकास कक्षाला यश आले आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचा विवाह करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. असे असतांनाही लॉकडाऊनमध्ये आलेले निर्बंध तसेच आर्थिक संकटामुळे अल्पवयीन मुलींचे विवाह लावून देण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.

गेल्या मार्च महिन्यात ६, एप्रिलमध्ये ९, तर मे महिन्यात ४ असे एकूण १९ प्रकार जिल्ह्यात समोर आले. गावातील जागरूक नागरिकांनी याप्रकरणी वेळीत चाईल्ड लाईन तसेच महिला बालविकास कार्यालयाला याबाबतची माहिती दिल्याने अल्पवयीन मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर असे विवाह रोखण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन विवाह करण्याबाबतचे अनेक सामाजिक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. बेरोजगारी, गरिबी, मुलींबाबतचा दृष्टिकोन, मुलाकडून करण्यात येणारा लग्नाचा खर्च ,तसेच शिवाय अशा लग्नाची चर्चा न होता नातेवाईकांमध्येच लग्न उरकण्याची संधी असल्यानेदेखील अनेकांनी ही संधी साधण्याचा प्रयत्न समोर आला.

--इन्फो--

तालुकानिहाय प्रकरणे

नाशिक: ४,

सिन्नर, ३,

त्र्यंबकेश्वर २,

मालेगाव, ३,

दिंडोरी २,

येवला १

निफाड १

चांदवड २

जिल्ह्याबाहेरील १

--कोट--

प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले जातात. आपण जाणीव जागृती करीत असलो तरी असे प्रकार समाजात घडत असतात अशावेळी सर्व खात्री करून स्थानिक यंत्रणेच्या माध्यातून याबाबतची कार्यवाही केली जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कळविले जाते.

-सुरेखा पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी.

--कोट--

जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या अनेक तक्रारी चाईल्ड लाईन कडे येत असल्या तरी त्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि नागरीकांची भुमिका महत्वाची ठरते. जिल्हा महिला बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्राम बाल संरक्षण समिती यांच्याकडून शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाते. तक्रार दिलेल्याचे नाव गोपनीय ठेऊन असे प्रकार रोखले जाते.

- प्रविण आहेर, चाईल्डलाईन.

--इन्फो--

अशी आहेत कारणे

१) हालाखीची आर्थिक परिस्थिती

२) घरातील एक सदस्य कमी करण्याची मानसिकता

३) मुूलीचे प्रेमसंबध होण्याची पालकांना भीती

४) मुलाकडून लग्नाचा खर्च करण्याची तयारी

५) लॉकडाऊनमुळे कमी खर्च