शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

निर्बंधाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुली बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST

संदीप भालेराव नाशिक : कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याची गंभीर ...

संदीप भालेराव

नाशिक : कोरोनामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध असल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जात असल्याची गंभीर बाब लॉकडाऊनच्या काळात समेार आली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारचे १९ प्रकार उघडकीस आले असून या अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. याप्रकरणी वधू-वरांसह पालकांचे समुपदेशन करण्यात आले तर तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणांवरून कमी खर्चात आणि कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह करावा लागत असल्याने ही संधी साधत अनेकांनी अल्पवयीन मुलीच्या विावाहाचे बेत आखल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. मात्र काही जागरूक नागरिकांच्या मदतीने अशा प्रकारचे विवाह रोखण्यात चाईल्डलाईन आणि महिला बालविकास कार्यालयाच्या बाल विकास कक्षाला यश आले आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचा विवाह करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे संबंधितांवर बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. असे असतांनाही लॉकडाऊनमध्ये आलेले निर्बंध तसेच आर्थिक संकटामुळे अल्पवयीन मुलींचे विवाह लावून देण्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.

गेल्या मार्च महिन्यात ६, एप्रिलमध्ये ९, तर मे महिन्यात ४ असे एकूण १९ प्रकार जिल्ह्यात समोर आले. गावातील जागरूक नागरिकांनी याप्रकरणी वेळीत चाईल्ड लाईन तसेच महिला बालविकास कार्यालयाला याबाबतची माहिती दिल्याने अल्पवयीन मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर असे विवाह रोखण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन विवाह करण्याबाबतचे अनेक सामाजिक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. बेरोजगारी, गरिबी, मुलींबाबतचा दृष्टिकोन, मुलाकडून करण्यात येणारा लग्नाचा खर्च ,तसेच शिवाय अशा लग्नाची चर्चा न होता नातेवाईकांमध्येच लग्न उरकण्याची संधी असल्यानेदेखील अनेकांनी ही संधी साधण्याचा प्रयत्न समोर आला.

--इन्फो--

तालुकानिहाय प्रकरणे

नाशिक: ४,

सिन्नर, ३,

त्र्यंबकेश्वर २,

मालेगाव, ३,

दिंडोरी २,

येवला १

निफाड १

चांदवड २

जिल्ह्याबाहेरील १

--कोट--

प्राप्त झालेल्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले जातात. आपण जाणीव जागृती करीत असलो तरी असे प्रकार समाजात घडत असतात अशावेळी सर्व खात्री करून स्थानिक यंत्रणेच्या माध्यातून याबाबतची कार्यवाही केली जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांना कळविले जाते.

-सुरेखा पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी.

--कोट--

जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या अनेक तक्रारी चाईल्ड लाईन कडे येत असल्या तरी त्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि नागरीकांची भुमिका महत्वाची ठरते. जिल्हा महिला बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्राम बाल संरक्षण समिती यांच्याकडून शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाते. तक्रार दिलेल्याचे नाव गोपनीय ठेऊन असे प्रकार रोखले जाते.

- प्रविण आहेर, चाईल्डलाईन.

--इन्फो--

अशी आहेत कारणे

१) हालाखीची आर्थिक परिस्थिती

२) घरातील एक सदस्य कमी करण्याची मानसिकता

३) मुूलीचे प्रेमसंबध होण्याची पालकांना भीती

४) मुलाकडून लग्नाचा खर्च करण्याची तयारी

५) लॉकडाऊनमुळे कमी खर्च