शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बालभिकाऱ्यांची मुक्तता कधी?

By admin | Updated: July 8, 2014 00:58 IST

बालभिकाऱ्यांची मुक्तता कधी?

संदीप भालेराव

नाशिकराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी राज्य बालभिकारी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कामकाजही सुरू केले आहे. संपूर्ण राज्यात किती बालभिकारी आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, याच्या चौकशीसाठी शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नाशिक शहर हे धार्मिक स्थळ असल्याने येथेही मोठ्या प्रमाणात बालभिकारी आहेत. परंतु त्यांचे निर्मूलन व्हावे, या व्यवसायातून बालकांची सुटका करावी, असे कोणतेही ठोस उपाय येथे होताना दिसत नाहीत. असंख्य ‘एनजीओ’ असतानाही आणि दररोज लाखो लोक शहरात फिरत असतानाही या बालकांना पाहून कुणाच्याही संवेदना जाग्या होणार नसतील, तर या बालभिकाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न कायम राहील. राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही बालभिकाऱ्यांच्या निर्मूलनासाठी व्यापक कार्यक्रम उभारण्यासाठी लोकचळवळीची गरज नाही का ? नाशिकमध्ये बालभिकाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. धार्मिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिकनगरीत दानधर्माची परंपरा असल्याने भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. मागील सिंहस्थात नाशिकमध्ये भिकाऱ्यांसाठी निवारागृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाने महिला व बालकल्याण विभागाला पाठविला होता. परंतु त्यास इतका विरोध झाला की अखेर हा प्रस्ताव शासनाला गुंडाळून ठेवावा लागला. कुंभमेळ्यात दानाचे पुण्य पदरी पडावे यासाठीचा हा विरोध होता. कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर त्यावर कधी चर्चाच झाली नाही. शहरातील बसथांबे, मंदिरे आणि सिग्नलवर दिसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या पाहता त्यात लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही मुले काही स्वत:च्या चैनीसाठी किंवा कुटुंब चालविण्याची जबाबदारी म्हणून भीक मागतात, असे नव्हे तर त्यांच्या माध्यमातून भीक मिळणे सुलभ होते म्हणून त्यांचा वापर केला जातो आणि सारेच हे निमूटपणे पाहत असतात. नाशिकमध्ये अनेक एनजीओ आहेत, राजकीय पक्षांच्या सामाजिक शाखा आहेत, तसेच शासनाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत, परंतु तरीही बालभिकाऱ्यांचा प्रश्न कायम असेल तर पुढाकार घेणार कोण? ज्या महिलांच्या कडेवर लहान बालक, हाताला मूल, त्या मुलाच्याही कडेवर बाळ असेल, तर संबंधित माता आणि त्या बालकांच्या वयोमानाचा विचार केला तर ही मुले खरेच त्या महिलेची आहेत का? अशी शंका उपस्थित व्हावी इतपत त्यांच्या वयांमध्ये फरक जाणवतो. शहरात कुठेही असा फेरफटका मारला, तर आपणाला अशा तरुण माता दिसतील की त्यांच्याजवळ तीनपेक्षा अधिक मुले आणि बाळेही असतात. ही मुले नेमकी कोणाची, याच्या खोलात शिरले तर मोठे भयावह वास्तव समोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र शासनानेच उपक्रम राबविण्याची गरज आहे. राजस्थान सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणानंतर अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर कदाचित या व्यवसायातील अनैतिकता समोर येऊ शकते. भीक मागण्यासाठी लहान बाळक आणि मुलांचा उपयोग होत असल्याची चर्चा काही सामाजिक संस्था करतात; परंतु हे आमचे काम नाही म्हणून त्याही तिकडे दुर्लक्ष करतात.