शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बालभिकाऱ्यांची मुक्तता कधी?

By admin | Updated: July 8, 2014 00:58 IST

बालभिकाऱ्यांची मुक्तता कधी?

संदीप भालेराव

नाशिकराजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी राज्य बालभिकारी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कामकाजही सुरू केले आहे. संपूर्ण राज्यात किती बालभिकारी आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे, याच्या चौकशीसाठी शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नाशिक शहर हे धार्मिक स्थळ असल्याने येथेही मोठ्या प्रमाणात बालभिकारी आहेत. परंतु त्यांचे निर्मूलन व्हावे, या व्यवसायातून बालकांची सुटका करावी, असे कोणतेही ठोस उपाय येथे होताना दिसत नाहीत. असंख्य ‘एनजीओ’ असतानाही आणि दररोज लाखो लोक शहरात फिरत असतानाही या बालकांना पाहून कुणाच्याही संवेदना जाग्या होणार नसतील, तर या बालभिकाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न कायम राहील. राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही बालभिकाऱ्यांच्या निर्मूलनासाठी व्यापक कार्यक्रम उभारण्यासाठी लोकचळवळीची गरज नाही का ? नाशिकमध्ये बालभिकाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. धार्मिक शहर अशी ओळख असलेल्या नाशिकनगरीत दानधर्माची परंपरा असल्याने भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. मागील सिंहस्थात नाशिकमध्ये भिकाऱ्यांसाठी निवारागृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाने महिला व बालकल्याण विभागाला पाठविला होता. परंतु त्यास इतका विरोध झाला की अखेर हा प्रस्ताव शासनाला गुंडाळून ठेवावा लागला. कुंभमेळ्यात दानाचे पुण्य पदरी पडावे यासाठीचा हा विरोध होता. कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर त्यावर कधी चर्चाच झाली नाही. शहरातील बसथांबे, मंदिरे आणि सिग्नलवर दिसणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या पाहता त्यात लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही मुले काही स्वत:च्या चैनीसाठी किंवा कुटुंब चालविण्याची जबाबदारी म्हणून भीक मागतात, असे नव्हे तर त्यांच्या माध्यमातून भीक मिळणे सुलभ होते म्हणून त्यांचा वापर केला जातो आणि सारेच हे निमूटपणे पाहत असतात. नाशिकमध्ये अनेक एनजीओ आहेत, राजकीय पक्षांच्या सामाजिक शाखा आहेत, तसेच शासनाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत, परंतु तरीही बालभिकाऱ्यांचा प्रश्न कायम असेल तर पुढाकार घेणार कोण? ज्या महिलांच्या कडेवर लहान बालक, हाताला मूल, त्या मुलाच्याही कडेवर बाळ असेल, तर संबंधित माता आणि त्या बालकांच्या वयोमानाचा विचार केला तर ही मुले खरेच त्या महिलेची आहेत का? अशी शंका उपस्थित व्हावी इतपत त्यांच्या वयांमध्ये फरक जाणवतो. शहरात कुठेही असा फेरफटका मारला, तर आपणाला अशा तरुण माता दिसतील की त्यांच्याजवळ तीनपेक्षा अधिक मुले आणि बाळेही असतात. ही मुले नेमकी कोणाची, याच्या खोलात शिरले तर मोठे भयावह वास्तव समोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र शासनानेच उपक्रम राबविण्याची गरज आहे. राजस्थान सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणानंतर अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर कदाचित या व्यवसायातील अनैतिकता समोर येऊ शकते. भीक मागण्यासाठी लहान बाळक आणि मुलांचा उपयोग होत असल्याची चर्चा काही सामाजिक संस्था करतात; परंतु हे आमचे काम नाही म्हणून त्याही तिकडे दुर्लक्ष करतात.