शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील शैक्षणिक संस्थांचे फायर ऑडिट कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST

नाशिक : राज्यातील शैक्षणिक संस्थांना अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात सूचना दिली असतानाही या सूचनेचे योग्य पालन केले जात नाही. भंडारा ...

नाशिक : राज्यातील शैक्षणिक संस्थांना अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात सूचना दिली असतानाही या सूचनेचे योग्य पालन केले जात नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शासकीय रुग्णालये आणि दवाखान्यांसोबतच शैक्षणिक संस्थांच्या ‘फायर ऑडिट’चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नाशकातील शैक्षणिक संस्थांचे फायर ऑडिट कधी होणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता शाळा, महाविद्यालयांचे फायर ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नाशकातील पालकांकडून होत असून, भंडाऱ्यातील घटनेनंतर या मागणीने जोर धरला आहे. तामिळनाडूतील कुंभकोणममधील प्राथमिक शाळेला लागलेल्या आगीमध्ये होरपळून ९४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळांच्या फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेला आला. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर मुंबईतील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेली आग, सुरतमधील खासगी क्लासच्या आगीची दुर्घटनांमुळे शाळा, महाविद्यालयांमधील अग्निशमन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा, महाविद्यलयांमध्ये अग्निशमन सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने शैक्षणिक संस्थांनी शाळांच्या इमारतींचे फायर ऑडिट करून आवश्यक त्या सुरक्षा यंत्रणा अद्ययावत व कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

कोट-१

नाशिकमधील केवळ ४२ शाळांनीच आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यातील केवळ १७ शाळांनी नियमित नूतनीकरण व परीक्षण केल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. शहरातील अन्य शाळा व त्यांच्या आगप्रतिबंधात्मक यंत्रणेविषयी अग्निशमन विभागाकडे कोणतीही माहिती नाही. अग्निशमन विभागाकडून २०१३ पासून कोणतीही कारवाई झालेली नाही. आता भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेतून शहाणपण घेत शाळांचे फायर ऑडिट करण्याची गरज आहे.

-प्रदीप यादव, माहिती अधिकार जनजागृती समिती

कोट-

दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते हे दुर्दैवी आहे. विद्यार्थी सुरक्षेसाठी शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे अत्यावश्यक असून, शिक्षण विभागाने शाळांना मान्यता देतानाच यासंदर्भातील पडताळणी करून घेण्याची गरज आहे. शाळांनीही अशा अनपेक्षित दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणेचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करून त्याचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.

- निलेश साळुंखे , अध्यक्ष, नाशिक पॅरेंट्स असोसिएशन