शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

वसाकाची चाके पुन्हा एकदा पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:04 IST

लोहोणेर : वसंतदादा पाटील सहाकरी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ च्या थकीत वेतनासह कामगार आयुक्तांसमोर करावयाच्या करारास कारखाना चालविण्यास ...

ठळक मुद्देलोहोणेर : कामगारांनी अचानक बेमुदत काम बंद करण्याचा घेतला निर्णय

लोहोणेर : वसंतदादा पाटील सहाकरी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ च्या थकीत वेतनासह कामगार आयुक्तांसमोर करावयाच्या करारास कारखाना चालविण्यास घेतलेल्या धाराशिव साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय मंडळ हेतु पुरस्कर विलंब टाळाटाळ करीत असल्याने वसाकाच्या कामगारांनी मंगळवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेपासून अचानक बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने वसाकाची तीन वर्षांनंतर चालू झालेली चाके पुन्हा एकदा बंद पडली आहे.वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना यावर्षीपासून धाराशिव साखर कारखान्याने भाडेतत्वाने कराराने चालविण्यास घेतला आहे. राज्य सहकारी बँकेने घालून दिलेल्या अटीशर्तीनुसार बँकेची देणी देण्याबरोबरच कामगारांची मागील थकीत देणी देण्याचा मुद्दा करारात समाविष्ट करण्यात आलेला असतांनाही मात्र धाराशिव साखर कारखान्याने कामगारांना गळीत हंगाम चालू झाल्यापासूनचे फक्त वेतन दिले आहे.कारखाना भाडेतत्वाने चालू करताना कामगारांशी चर्चा केल्याप्रमाणे धाराशिव साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगार आयुक्तांसमोर करार करण्याचे मान्य केले होते मात्र त्यास टाळाटाळ केली जात आहे तसेच सन २०१७-१८ चे वेतन देण्यासही टाळाटाळ केली जात आहे याबाबत भाडेकरू धाराशिव साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाशी वेळोवेळी चर्चा करूनही कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही सर्व कामगारांनी मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, सरचिणीस रविंद्र सावकार, माजी अध्यक्ष विलास सोनवणे, कुबेर जाधव, आनंदा गुंजाळ, त्रंबक पवार, वसंत पगार, आनंदा देवरे, बापू देशमुख आदींनी दिली.या काम बंद आंदोलनात वसाकाचे सर्व ५०० कर्मचारी सहभागी झाल्याने कारखान्याचा गळीत हंगाम पूर्णत: बंद पडला असून कारखाना कार्यस्थळावर धाराशिव साखर कारखान्याचे एकमेव संचालक हजर असल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही तर वरिष्ठ अधिकारीही कार्यक्षेत्रात असल्याने त्यांची प्रतिक्रि या मिळाली नाही.चौकट ....१) धाराशिव साखर कारखान्याने चालू गळीत हंगामापासून राज्य सहकारी बँकेकडून वसाका चालविण्यास घेतला आहे त्यात दिलेल्या अटीशर्थींनुसार कामगारांशी करार करणे बंधनकारक असल्याने कामगारांशी चर्चा करून त्यावर लवकरच तोडगा काढावा.- राजेंद्र देशमुख, अवसायक वसाका.२) धाराशिव साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेकडून वसाका भाडेतत्वाने चालविण्यास घेताना दिलेल्या अटीशर्तीनुसार कारखान्यासह सहवीजनिर्मिती प्रकल्प व आसवानी देण्याचे ठरले होते मात्र अद्यापही आसवानी प्रकल्प धाराशिव साखर करण्याला ताब्यात न मिळाल्याने कामगारांशी करार करण्यास विलंब होत आहे त्याबाबत कामगारांशी वेळोवेळी चर्चा तरी कामगारांनी अडचणी न आणता गळीत हंग सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे.- संतोष कांबळे, संचालक, धाराशिव साखर कारखाना.३) कामगारांशी झालेल्या चर्चे प्रमाणे कामगारासंदर्भात कामगार आयुक्ता समोर करार होणे गरजेचे आहे. मात्र वसाकाच्या भाडेकरू धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापकीय मंडळाकडून सदर करार करण्यास जाणीव पूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे म्हणून आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे- अशोक देवरे, अध्यक्ष, कामगार युनियन, वसाका.