शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अभिरूप सभेतच सारे विषय संपवले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीने सुशिक्षित बेरोजगार व मजूर संस्थांना जे काही कामे वाटप केली, त्यात लोकप्रतिनिधी, ...

गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीने सुशिक्षित बेरोजगार व मजूर संस्थांना जे काही कामे वाटप केली, त्यात लोकप्रतिनिधी, सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या शिफारशी अव्हेरण्यात आल्याची तक्रार वजा राग मनात धरून लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन, असे अविश्वासाचे चित्र निर्माण झाले होते व ते आजवर कायम असल्याचे अजूनही जाणवत आहे. या साऱ्या प्रकरणात खलनायक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांना ठरविण्यात आले व त्यात काही प्रमाणात तथ्य असल्याचे पुरावेही पदाधिकारी, सदस्यांकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत याचे पडसाद उमटणार व सभागृह काही तरी ठोस निर्णय घेणार असे मानले जात होते, नव्हे सभेपूर्वी तसे वातावरण निर्मिती करण्यात तरी संबंधित यशस्वी झाले होते. त्यातच ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभा होणार असल्याने तर उपरोक्त व्यक्त केले जाणारे सर्वच अंदाज खरे ठरण्याची अपेक्षा होती; परंतु सभेपूर्वी अध्यक्षांच्या दालनात अभिरूप सभा घेऊन त्यात पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांची वाफ मोकळी केल्याचे मानले जाते व अधिकाऱ्यांविषयी जे काही आक्षेप होते तेदेखील नोंदविल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेचा कारभार व कामकाज पारदर्शी केला जात असल्याचा दावा आजवर पदाधिकारी व प्रशासनानेही कायमच केला आहे. तो असेलही त्याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारणही नाही. मात्र, बंद दरवाजाआड चर्चा करूनच जर सभेचे निर्णय घेण्यात येत असतील तर यापुढे सर्वच सभांपूर्वी अभिरूप सभा घेऊन ठराविक सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे वजा आश्वासने अधिकाऱ्यांकडून घेतले गेले तर सभेसाठी घातला जाणारा कालापव्यय टळण्यासही मदत होईल, शिवाय नवीन पायंडा पाडला म्हणून आणखी एक विक्रमाचा तुरा जिल्हा परिषदेच्या मानात खोवला जाईल. याचे श्रेय मात्र पदाधिकारी, प्रशासनाला देण्यास कोणाची हरकतही नसेल !

- श्याम बागूल