शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

किसनदेवाच्या करंगळीला काय झाले ?

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

किसनदेवाच्या करंगळीला काय झाले ?

दोन वर्षांपूर्वी वेद-वेदांग राष्ट्रीय पुरस्काराची पूर्णाहुती करण्यात आली आणि आता सारडा चॅरिटेबल फाउण्डेशनच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘सारडा समान संधी’ पुरस्काराचे विसर्जन करण्यात आले. उद्योजक किसनलाल सारडा आणि श्रीरंग सारडा या पिता-पुत्राचे सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील योगदान सर्वज्ञात आहे. वेद वाङ्मयाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने सारडा कुटुंबीयाने २५ वर्षे अखंडपणे ‘वेद-वेदांग पुरस्कार’ योजना राबविली आणि देशभरातील वेदपंडितांना नाशिकला निमंत्रित करत त्यांना सन्मानित केले. परंतु एकामागोमाग वर्षे सरत गेली तशी पुरस्कारयोग्य वेदपंडितांना हुडकून काढण्याची कसरतही सारडा यांना करावी लागली. या मोहिमेत अडचणी येत असल्याचे वास्तव अस्वस्थ करून सोडत असतानाच, किसनलाल सारडा यांनी सन २०१२ मध्ये ‘वेद-वेदांग राष्ट्रीय पुरस्कार’ बंद करण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला होता. आता सारडा यांनी तळागाळातील पीडितांचे जीवनमान उंचाविणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी गेल्या १४ वर्षांपासून अखंडपणे दिल्या जाणाऱ्या ‘सारडा समान संधी’ पुरस्काराची सांगता करत आणखी एक धक्का दिला आहे. साडेसात लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. समाजात नि:स्पृह आणि निष्काम भावनेतून काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना उभारी देणारा आणि त्यांची उमेद वाढविणारा हा पुरस्कार होता. या पुरस्कारासाठी कोणाकडूनही अर्ज मागविले जात नव्हते, तर फाउण्डेशन स्वत: देशभर भटकंती करत पुरस्कारयोग्य संस्था अथवा व्यक्तींना हुडकून काढत असे व हेच या पुरस्काराचे वेगळेपण होते. ग्रामीण उद्योगांच्या माध्यमातून वंचित व उपेक्षित घटकांना स्वत:च्या पायावर उभे करणारे साताऱ्याचे बाळासाहेब धोंडीबा कोळेकर यांच्यापासून सुरू झालेला पुरस्काराचा प्रवास गेल्या वर्षी मदुराईतील धन फाउण्डेशनपर्यंत येऊन विसावला. या प्रवासात सारडा फाउण्डेशनला विजी श्रीनिवासन, श्रीमती एन. राधा, कांचन परुळेकर, रिटा रॉय, शोभा साखरवाडे, अच्युत दास, सुभाष मेंढापूरकर, वासिमलाई यांसारखे झाकलेले माणिक-मोती गवसले. पुरस्काराच्या निमित्ताने काही संस्थांच्या सेवाभावी कार्याचा परिचय लोकांना झाला. पुरस्काराचा वितरण सोहळा दरवर्षी मुंबईत मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत होत राहिला. एवढ्या मोठ्या रकमेच्या पुरस्काराची योजना राबविताना सारडा कुटुंबीय सदैव पुरस्काराचा १४ वर्षांचा प्रवास सुरळीत होता. दरवर्षी मुक्कामाची एकेक गावे शोधत पुरस्कार योजनेची गाडी पुढे मार्ग कापत होती. सारे सुरळीत असताना, सारडा फाउण्डेशनला पुरस्कार का थांबवावासा वाटला? किसनलाल सारडा यांनी पुरस्कार योजनेचा उचललेला गोवर्धन व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना उभारी देत होता. कुठेतरी थांबणे अनिवार्य होते असे फाउण्डेशनचे मत झाले असले, तरी ही अनिवार्यता कशामुळे ओढवली? किसनदेवाची करंगळी गोवर्धन पेलवू शकत नाही, असे म्हणणेही उचित ठरणार नाही. मग नेमके करंगळीला झाले काय? - असे अनेक प्रश्न सारडा कुटुंबीयांना अगदी जवळून ओळखणाऱ्या सुहृदांच्या मनात घोंगावत असणार ! वेद-वेदांग पुरस्काराला योग्य असे पंडित हुडकणे मुश्कील होऊन बसले, तेव्हा या पुरस्काराचे विसर्जन करण्यात आले होते. वेदवाङ्मयाची क्लिष्टता आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता या पुरस्काराचे विसर्जन होणे अपेक्षितच होते. कुणाच्याही पदरात पुरस्काराचे दान टाकणे हेसुद्धा त्या पुरस्काराच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे ठरले असते. म्हणूनच की काय, वेद-वेदांग पुरस्काराची पूर्णाहुती करण्याच्या निर्णयाचे समर्थनच केले गेले होते. मात्र, वेद-वेदांग पुरस्काराच्या योजनेत येणाऱ्या अडचणींचे स्वरूप निराळे होते. सारडा समान संधी पुरस्कारासाठी लायक व्यक्ती अथवा संस्थांचा शोध १४ वर्षांतच थांबवावा लागणे, हे कशाचे लक्षण समजायचे? निष्काम व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्ती आता समाजात अजिबातच उरल्या नाहीत, की सारडा फाउण्डेशनची शोधक नजर कमजोर झाली? समाजात समान संधीचा झगडा संपला आहे काय? अर्थात हे सारे प्रश्न उपस्थित होणार असले, तरी पुरस्कार योजना सुरू करणे आणि ती कधीही-केव्हाही थांबविणे हा सर्वस्वी सारडा फाउण्डेशनचा निर्णय आहे. त्याबाबत त्यांना कुणी जाब विचारू शकत नाही ्रआणि त्याची गरजही नाही; परंतु व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींना उभारी देणाऱ्या पुरस्काराची सांगता होते आहे, हे दु:खदायकच आहे. मुळात फाउण्डेशनला असा अकाली निर्णय घेणे भाग का पडले, याचीही चिकित्सा होणे गरजेचे आहे. एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी खूपदा विचार करावा लागतो; परंतु तो थांबविण्यासाठी एक किरकोळ कारणही पुरेसे ठरू शकते. ज्यांना प्रोत्साहन द्यावे आणि इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, अशा संस्था अथवा व्यक्तींचा शोध जर सारडा फाउण्डेशनला थांबवावा लागत असेल, तर गेल्या चौदा वर्षांत राबविलेला प्रपंच फुकटच गेला म्हणायचा