शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

गाव करी ते राव काय करी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:49 IST

केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली

ठळक मुद्देओढा, कोटमगाव ग्रामपंचायतीची देशपातळीवर दखल

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गाव करी ते राव काय करी असे म्हटले जात असले तरी, त्याची प्रचिती नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतीने दिली आहे. केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक तालुक्यातील ओढा व कोटमगाव ग्रामपंचायतींनी जनहिताचे उल्लेखनीय कामे केली असून, त्याचीच दखल घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कचरामुक्त गाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या उपाययोजना व ग्रामपंचायतीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न अन्य ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत आहेत.

ओढा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३३२१ इतकी असून, गावाच्या विकासासाठी ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. गावात उल्लेखनीय कामकाजात प्रामुख्याने १०० टक्के भूमिगत गटार बांधकाम, कचरामुक्त गाव, ग्रामपंचायतमार्फत आरोग्य केंद्रामध्ये सॅनेटरी पॅड वेंडिग मशीन बसविण्यात आले असून, जलसंधारणांतर्गत गावातील पाझर तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या संगणकीकरणांतर्गत सोशल मीडियाचा वापर करण्यात येत असून, बायोगॅस संयंत्र, गावातील सर्व नागरिकांना पाणी शुद्धीकरण केंद्रामधून पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाण्याचा लाभ, डिजिटल शिक्षणांतर्गत अंगणवाडी व प्राथमिक शाळेस संगणक व प्रोजक्टर, दर शनिवारी भरणाºया आठवडे बाजार तळासाठी ओटे, उत्पन्न वाढीकरिता बहुउद्देशीय इमारत बांधण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या याकामांची दखल घेत यापूर्वी ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार’देखील मिळाला असून, याकामी सरपंच विष्णू रामभाऊ पेखळे, उपसरपंच शशिकांत सहाणे व ग्रामसेवक दौलत पांडुरंग गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.कोटमगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या १५७५ असून, गावाचा कायापालट करताना अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यात गावात वृक्षलागवड, जलशुद्धीकरण केंद्र, डिजिटल शाळा व अंगणवाडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम, गावातील महिला, मुलींसाठी सॅनिटरी पॅड वितरण व विल्हेवाट मशीन, कुपोषित बालकांसाठी नियमित आरोग्य चाचणी आदी योजना राबविण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी केलेल्या कामांची दखल घेत ‘निर्मलग्राम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सरपंच बाळकृष्ण म्हस्के उपसरपंच समाधान रंगनाथ जाधव व ग्रामसेवक बाळासाहेब कदम यांनी याकामी विशेष कामगिरी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद