शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

गिरीश महाजन : केंद्र सरकार निधी देण्यासाठी सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णाच्या पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकारदेखील सकारात्मक असून, त्यासाठी हवा तितका निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत या संदर्भातील चांगला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर अधिक माहिती देताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या आठवड्यापासून जलसंपदा खात्याची सारी यंत्रणा या प्रश्नावर अभ्यास करीत असून, पश्चिम वाहिन्यांचे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे, हे पाणी महाराष्ट्राला व विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. नाशिक, मराठवाडा, जळगाव, मालेगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. या संदर्भात मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सकारात्मक दर्शवित त्यासाठी लागेल तितका निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या प्रश्नावर चांगला तोडगा निघण्याची शक्यता आहे. लवकरच या संदर्भात केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेण्यात येणार असून, वेळ पडल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून या संदर्भात मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी महाराष्ट्राचे हक्काचे ५७ टीएमसी पाणी गुजरातकडे जात असल्याची बाब महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली होती.चौकट====राज्यातील हक्काचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. राज्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सज्ज आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे संकेत सरकारने यापूर्वीच दिले असल्यामुळे महिनाभरात या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.