शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

गिरीश महाजन : केंद्र सरकार निधी देण्यासाठी सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णाच्या पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकारदेखील सकारात्मक असून, त्यासाठी हवा तितका निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत या संदर्भातील चांगला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर अधिक माहिती देताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या आठवड्यापासून जलसंपदा खात्याची सारी यंत्रणा या प्रश्नावर अभ्यास करीत असून, पश्चिम वाहिन्यांचे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे, हे पाणी महाराष्ट्राला व विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. नाशिक, मराठवाडा, जळगाव, मालेगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. या संदर्भात मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सकारात्मक दर्शवित त्यासाठी लागेल तितका निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या प्रश्नावर चांगला तोडगा निघण्याची शक्यता आहे. लवकरच या संदर्भात केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेण्यात येणार असून, वेळ पडल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून या संदर्भात मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी महाराष्ट्राचे हक्काचे ५७ टीएमसी पाणी गुजरातकडे जात असल्याची बाब महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली होती.चौकट====राज्यातील हक्काचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. राज्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सज्ज आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे संकेत सरकारने यापूर्वीच दिले असल्यामुळे महिनाभरात या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.