शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्याचा निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

गिरीश महाजन : केंद्र सरकार निधी देण्यासाठी सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णाच्या पश्चिम भागातील नद्यांचे गुजरातमार्गे समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून त्याचा पूर्वभागासाठी उपयोग करून घेण्यासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविण्यास केंद्र सरकारदेखील सकारात्मक असून, त्यासाठी हवा तितका निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत या संदर्भातील चांगला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर अधिक माहिती देताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या आठवड्यापासून जलसंपदा खात्याची सारी यंत्रणा या प्रश्नावर अभ्यास करीत असून, पश्चिम वाहिन्यांचे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे, हे पाणी महाराष्ट्राला व विशेषत: पूर्वभागाला मिळाल्यास गोदावरी व तापी खोऱ्याचा भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होणार आहे. नाशिक, मराठवाडा, जळगाव, मालेगाव या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटेल ही बाब राज्य सरकारलाही तत्त्वत: पटली आहे. या संदर्भात मंगळवारी रात्री एक वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेण्यात आली. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे निश्चित झाले असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष साइटवर भेटी दिल्या जात आहेत. केंद्र सरकारनेदेखील त्यासाठी सकारात्मक दर्शवित त्यासाठी लागेल तितका निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत या प्रश्नावर चांगला तोडगा निघण्याची शक्यता आहे. लवकरच या संदर्भात केंद्रीयमंत्री उमा भारती यांचीही भेट घेण्यात येणार असून, वेळ पडल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून या संदर्भात मोठी घोषणा होण्याचे सूतोवाचही महाजन यांनी केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार जिवा पांडू गावित यांनी महाराष्ट्राचे हक्काचे ५७ टीएमसी पाणी गुजरातकडे जात असल्याची बाब महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली होती.चौकट====राज्यातील हक्काचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे. राज्यातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सज्ज आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी अडविण्याचे संकेत सरकारने यापूर्वीच दिले असल्यामुळे महिनाभरात या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.