शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

बरे झाले, भूमाफियानिमित्ताचे कारण मिळाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST

गेल्या पंधरवड्यात पोलीस आयुक्तांनी ‘भूमाफिया’ लघुचित्रफीत प्रसारित केली आणि महसूल खात्याला आपली बदनामी झाल्याचे वाटू लागल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांविरोधात ...

गेल्या पंधरवड्यात पोलीस आयुक्तांनी ‘भूमाफिया’ लघुचित्रफीत प्रसारित केली आणि महसूल खात्याला आपली बदनामी झाल्याचे वाटू लागल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांविरोधात ‘सह्यांची जंग’ सुरू केली. सारे अधिकारी यानिमित्ताने एकवटले. संघटितपणे सुरू झालेल्या या मोहिमेतून एकीचे बळ दिसत असले तरी महसूल विभागाची बदनामी ही केवळ पोलिसांमुळेच झाली आहे का, असा थेट सवाल करीत काही अधिकाऱ्यांनी महसुलातील अन्यायकारक आणि गैरप्रकारावरही बोट ठेवल्याने संघटीत मोहिम एकसंध नसल्याचे दिसून आले. त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महसूल खात्यात कामकाजाच्या माध्यमातून छळाच्या होणाऱ्या तक्रारी, बदलीतील अन्याय, विभागीय चौकशा या बाबी घडतातच. मग आता बोलणारे तेव्हा का बोलत नाहीत, असे काही अधिकाऱ्यांना वाटत असेल त्यांचेही समाधान होणे सह्यांच्या मोहिमेला बळ देणारे ठरणारे आहे. त्यामुळे त्यांचा मुद्या औचित्याचा म्हणावा लागेल.

खरेतर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांमधील शीतयुद्ध हे देखील या चित्रफितीमागचे कारण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भूमाफिया प्रकरणावरून प्रशासन प्रमुखावरील राग व्यक्त करण्याला देखील अनेकांना वाव मिळून गेला. समाजमाध्यमांमध्ये महसूल विभागाची बदनामी होत असताना प्रशासन प्रमुख कोणतीच भूमिका घेताना दिसले नसल्याने त्यांना यानिमित्ताने जाब विचारण्यात आला, हेही बरेच झाले. दुसरे असे की, सुडाच्या भावनेतून चित्रफीत केल्याचा वास येत असेल तर पेालीस यंत्रणेनेही आत्मभान राखायला हवे. खरेतर दोन्ही खात्यांना कायद्याचे ज्ञान हे असतेच, त्यातून दोहोंची बदनामीही होऊ नये इतकेच.

पेालीसांनी महसूल अधिकाऱ्यांवर सुरू केलेल्या कारवाया आहेत की कुरबुरी हाही वादाचाच मुद्या आहे. तसेही पोलिसांनी धाडलेल्या नोटिसा आणि सुरू केलेल्या चौकशीतून दोष नसणाऱ्यांनी घाबरण्याचे कारणही नाही. डाग नसलेले अधिकारी सहीसलामतही राहतील; मात्र अन्यायाची परिभाषा केवळ दुसऱ्या विभागापुरतीच मर्यादित राहू नये, असे असे काही अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यातही गैर वाटण्याचे कारणही नाही. यानिमित्ताने का होईना संघटीत संघर्ष हा महसूल विभागांतर्गत होणाऱ्या अन्यायाबाबतचा देखील उभा राहावा किंबहूना याबाबतचा आवाज उठविणाऱ्या बीजांची रुजवात यानिमित्ताने होऊन जावी हेही महत्त्वाचे आहे.

-इन्पो--

चित्रफीत आणि क्लिप

भूमाफिया या चित्रफितीमुळे दोन विभागांमध्ये जुंपलेली असतानाच येवला येथील महिला तलाठीने व्हायरल केलेल्या क्लिपमुळेही महसूल विभागाला डाग लागून गेला. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणाऱ्या महिलेला ‘तमाशा’ म्हटल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहेच, ती अद्याप उघड झालेली नाही इतकेच. याचा अर्थ त्या शांत आहेत, असाही घेता येणार नाही. अन्याय होत असल्याची भावना झालेल्या काही अधिकाऱ्यांनी थेट नाराजी दर्शवलेली आहेच, महिलांमध्येही ठिणगी पडली नाही म्हणजे मिळवले.

-संदीप भालेराव, (वार्तापत्र)