शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

विहिरी बोअरवेल कुपनलिका कोरड्या ठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 19:12 IST

पाटोदा : राज्यात दुष्काळी तालुका म्हणून असलेल्या येवले तालुक्यातील दुष्काळाचे दृष्टचक्र यंदाही संपलेले नाही. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत असून यंदा भयानक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा : इतर स्रोतही आटले

पाटोदा : राज्यात दुष्काळी तालुका म्हणून असलेल्या येवले तालुक्यातील दुष्काळाचे दृष्टचक्र यंदाही संपलेले नाही. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत असून यंदा भयानक स्थिती निर्माण झाली आहे.खरीप व रब्बी हंगाम वायागेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कुपनलिका कोरड्याठाक पडल्या तर बोअरवेल, हातपंप, कुपनलिकानी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्नानेही उग्ररूप धारण केले असल्याने जनावरे जागविण्याकरीता मोठे कष्ट घ्यावे लागतआहेत. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने मजुरांच्या हातांना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.येवल्याच्या उत्तर पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासहून अधिक गावे व तीस वाड्या-वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.शासनाने येवला तालुक्यातील काही गावे ही दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरु न केल्यामुळे या भागातील मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात जात असल्याने गावे ओस पडू लागले आहेत. मजुरांचे हे स्थलांतर रोखण्यासाठी या मजुरांच्या हातांना गावातच रोजगार व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दयावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पिक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली .कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पिण्याच्या पाण्याचा व रोजगाराचा प्रश्न गंभीर असतानाच शेतकरी पशुपालकांकडे असलेल्या दुभत्या व शेतीउपयोगी जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. आजमितीस जनावरांना हिरवा चारा सोडा साध्या काड्या, पाला पाचोळा व ऊसाच्या पाचटावर गुजराण करावी लागत आहे. परिणामी इतर तालुक्यात उपलब्ध असलेला ऊस व हिरवा चाºयाचे भावही वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनाने या भागात चारा छावण्या सुरु कराव्या अथवा चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.