शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By admin | Updated: July 10, 2017 00:04 IST

इगतपुरी : परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : महाराष्ट्राची प्रवासी विकासवाहिनी व ग्रामीण भागाची सुखरूप प्रवासाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी चतुर यांनी एसटीचा इतिहास सादर करताना सांगितले की, खेडी, पाडे आणि वाडी- वस्त्यांवरील विश्वासाची व सुखरूप प्रवासाची खात्री असलेल्या एसटीची बऱ्याच ठिकाणी आजही मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र नजीकच्या काळात अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास करण्यास पसंती दिल्याने आपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील व आता शहरी भागातील जनताही सुखरूप प्रवासासाठी, इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटीला अग्रक्रम देत आहेत. शासनाने खासगी प्रवासी वाहतुकीस आळा बसावा व प्रवाशांना अल्पदरात आरामदायी प्रवास व्हावा याकरिता येत्या काही महिन्यांत १२०० नवीन आरामदायी बसेस सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे. आता प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ असे ब्रिदवाक्य लिहिलेले दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटीचे प्रवासी धोरण म्हणजे व्यापार नसुन सेवा कार्य आहे, असे चतुर यांनी सांगितले.एसटी कामगार संघटना ही एसटी महामंडळाला व प्रवाशांना वेळोवेळी सहकार्याची भूमिका बजावत कामगारहित जोपासत असते. महामंडळाच्या विकासाचे ध्येय ठेवून कामगार सतत एकजुटीने कार्यरत असतात, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी सांगितले.आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर, स्थानकप्रमुख व्ही. वाय. ढेपणे, स. का. अ. पी. आर. देवीकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांसह सर्व कर्मचारी व प्रवासी यावेळी उपस्थित होते. अशोक बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. पी. आर. ढेपणे यांनी आभार मानले.