शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By admin | Updated: July 10, 2017 00:04 IST

इगतपुरी : परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : महाराष्ट्राची प्रवासी विकासवाहिनी व ग्रामीण भागाची सुखरूप प्रवासाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन महामंडळाचा ६९ वा वर्धापन दिन आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी चतुर यांनी एसटीचा इतिहास सादर करताना सांगितले की, खेडी, पाडे आणि वाडी- वस्त्यांवरील विश्वासाची व सुखरूप प्रवासाची खात्री असलेल्या एसटीची बऱ्याच ठिकाणी आजही मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र नजीकच्या काळात अनेक प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास करण्यास पसंती दिल्याने आपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील व आता शहरी भागातील जनताही सुखरूप प्रवासासाठी, इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटीला अग्रक्रम देत आहेत. शासनाने खासगी प्रवासी वाहतुकीस आळा बसावा व प्रवाशांना अल्पदरात आरामदायी प्रवास व्हावा याकरिता येत्या काही महिन्यांत १२०० नवीन आरामदायी बसेस सुरू करण्याचा महामंडळाचा मानस आहे. आता प्रत्येक एसटीवर ‘जय महाराष्ट्र’ असे ब्रिदवाक्य लिहिलेले दिसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटीचे प्रवासी धोरण म्हणजे व्यापार नसुन सेवा कार्य आहे, असे चतुर यांनी सांगितले.एसटी कामगार संघटना ही एसटी महामंडळाला व प्रवाशांना वेळोवेळी सहकार्याची भूमिका बजावत कामगारहित जोपासत असते. महामंडळाच्या विकासाचे ध्येय ठेवून कामगार सतत एकजुटीने कार्यरत असतात, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी सांगितले.आगार व्यवस्थापक बी. एस. चतुर, स्थानकप्रमुख व्ही. वाय. ढेपणे, स. का. अ. पी. आर. देवीकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक बोराडे यांसह सर्व कर्मचारी व प्रवासी यावेळी उपस्थित होते. अशोक बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. पी. आर. ढेपणे यांनी आभार मानले.