येवला : धुळे जिल्ह्यातील गोताणे येथून विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचे येवल्यात स्वागत करण्यात आले. गोताणे येथून जगन्नाथ महाराज व महाराष्ट्रभूषण वेदांत वाचस्पती दामोधर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता दिंडीचे विंचूर चौफुलीवर आगमन झाले.जनकल्याण सेवा समितीचे नारायण शिंदे, धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके, बाबासाहेब वाघ, खटपट युवा मंचचे मुकेश लचके यांच्यासह येवलेकरांनी पालखीचे पूजन, दिंडीतील महाराजांसह वारकऱ्यांचे स्वागत केले.शहरातील मुख्य रस्त्याने निघालेली दिंडी संत श्री नामदेव महाराज मंदिरात पोहोचली. दिंडीत सुमारे दीडशे स्त्री-पुरुष वारकरी सहभागी झाले आहेत. टाळ, मृदंग, खांद्यावर भगव्या पताका, महिलांच्या डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन हरिनामाचा गजर करीत निघालेल्या या दिंडीचे शहरात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. नामदेव मंदिरात वारकऱ्यांच्या चहा, नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. वीणाधारकांचाही सत्कार करण्यात आला. विश्रांतीनंतर दिंडी पुढे मार्गस्थ झाली. यावेळी देवीदास भांबारे, रामा तुपसाखरे, ज्ञानेश टिभे, विशाल तुपसाखरे, अमोल लचके, पांडुरंग खंदारे, राजेंद्र कल्याणकर, तुषार भांबारे, वरद लचके, सिद्धेश्वर लहाने, नीलेश टिभे, संदेश खैरे, सोनू निरभवणे, कृष्णा आव्हाड, सोमनाथ लचके, राहुल भांबारे, ज्ञानेश्वर पाबळे, पिंटू माळवे, पंकज शिंदे, रोहित नागपुरे, तुषार खैरनार, गौतम सोपे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
येवल्यात दिंडीचे स्वागत
By admin | Updated: June 29, 2016 23:02 IST