शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मशाल ज्योत यात्रेचे चांदवडला स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:17 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किनार लाभलेले इतिहासाचे पान आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किनार लाभलेले इतिहासाचे पान आहे. शिवाजी महाराज राजगडावर सुखरूप पोहोचले होते. तो दिवस होता १७ ऑगस्ट १६६६. आज घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आग्रा ते राजगड, अशी गरुडझेप मोहीम राबवली जात आहे.

चांदवड येथील श्री रेणुका देवी मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता. यावेळी सर्वांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुढील यात्रा किल्ले गडांवरील ज्योती पेटवून धाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करत चांदवड ते नाशिक, असा प्रवास चालू केला आहे.

राजगडाच्या मातीचे पूजन करून योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करून या मोहिमेची सुरुवात झाली होती. लाल किल्ल्याच्या प्रांगणात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्यासमोर सर्व मोहिमेतील सर्व मंडळींना स्थानिक मराठी बांधवांना भगवा फेटा घालून याची सुरुवात झाली. चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, बाळासाहेब कासलीवाल, सचिन निकम, महेंद्र कर्डिले, देवा पाटील, योगेश अजमेरा, पिंटू रहाणे, पराग कासलीवाल, बाळा सोनवणे, कुणाल रहाणे, पप्पू कोतवाल, कुमावत, नितीन फंगाळ आदी उपस्थित होते.