शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आॅगस्ट क्रांती जागर यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:09 IST

संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.

संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.आॅगस्ट क्रांती दिनाला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राष्टÑ सेवा दलाच्या वतीने आॅगस्ट क्रांती जागर यात्रा आज मालेगाव शहरात आली होती. या यात्रेचे या. ना. जाधव विद्यालयात विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. खैरनार हे बोलत होते. खैरनार पुढे म्हणाले की, दलितांवर हल्ले होत आहेत. दोन समाजात गोहत्या बंदीवरून नाहक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातले हे वातावरण खेदजनक आहे. मूळ प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी भावनिक प्रश्नांवर राजकारण केले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमे ताब्यात घेतली जात आहेत. आगामी काळात जातीनुसार देशाचे तुकडे होतील. या सर्वांविरुद्ध सेवा दलाने देशभर जनजागरण सुरू केले आहे. नंदुरबार नजीकच्या रावळापाणी या आदिवासी बहुल गावातून यात्रेस ३१ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला आहे. साक्री, मालपूर कासारे, शहादा, धुळे मार्गे ही यात्रा दि. ८ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पोहोचेल. १९४२ च्या आंदोलनात राष्टÑ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. ‘चले जाव’ ही घोषणा युसुफ मेहेरअली या समाजवादी कार्यकर्त्यानेच सर्वप्रथम दिली असल्याची आठवण करून दिली. दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा येथे या जागर यात्रेचे मालेगावच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या. ना. जाधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेजीम पथकाच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा, संगमेश्वर मार्गे यात्रा नेण्यात आली.यावेळी डॉ. सुगन बरंठ, भास्कर तिवारी, अशोक फराटे, नचिकेत कोळपकर, अशोक पठाडे, संजय जोशी, विकास मंडळ, अनिल महाजन, राजेंद्र भोसले, ज्योती भोसले, जयेश शेलार, दत्ता वडगे, अ‍ॅड. जे. आर. अहिरे, स्वाती अहिरे, अल्लाउद्दीन शेख आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत ५५ स्वयंसेवकांसह झांजपथक सामील झाले आहे. शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.