शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्ट क्रांती जागर यात्रेचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:09 IST

संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.

संगमेश्वर : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण आदी वर्तमान प्रश्नांकडे डोळेझाक करून मोदी सरकार नवनवीन मुद्दे शोधून कांगावा करीत आहे. त्यामुळे देशातले वातावरण कधी नव्हे ते गढूळ झाले आहे. त्याविरुद्ध जनजागरण करण्यासाठी राष्टÑ सेवा दलाने कंबर कसली असल्याची माहिती राष्टÑ सेवा दलाचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. सुरेश खैरनार यांनी दिली.आॅगस्ट क्रांती दिनाला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राष्टÑ सेवा दलाच्या वतीने आॅगस्ट क्रांती जागर यात्रा आज मालेगाव शहरात आली होती. या यात्रेचे या. ना. जाधव विद्यालयात विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. खैरनार हे बोलत होते. खैरनार पुढे म्हणाले की, दलितांवर हल्ले होत आहेत. दोन समाजात गोहत्या बंदीवरून नाहक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. देशातले हे वातावरण खेदजनक आहे. मूळ प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी भावनिक प्रश्नांवर राजकारण केले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमे ताब्यात घेतली जात आहेत. आगामी काळात जातीनुसार देशाचे तुकडे होतील. या सर्वांविरुद्ध सेवा दलाने देशभर जनजागरण सुरू केले आहे. नंदुरबार नजीकच्या रावळापाणी या आदिवासी बहुल गावातून यात्रेस ३१ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला आहे. साक्री, मालपूर कासारे, शहादा, धुळे मार्गे ही यात्रा दि. ८ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पोहोचेल. १९४२ च्या आंदोलनात राष्टÑ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. ‘चले जाव’ ही घोषणा युसुफ मेहेरअली या समाजवादी कार्यकर्त्यानेच सर्वप्रथम दिली असल्याची आठवण करून दिली. दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा येथे या जागर यात्रेचे मालेगावच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या. ना. जाधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल व लेजीम पथकाच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. आंबेडकर पुतळा, संगमेश्वर मार्गे यात्रा नेण्यात आली.यावेळी डॉ. सुगन बरंठ, भास्कर तिवारी, अशोक फराटे, नचिकेत कोळपकर, अशोक पठाडे, संजय जोशी, विकास मंडळ, अनिल महाजन, राजेंद्र भोसले, ज्योती भोसले, जयेश शेलार, दत्ता वडगे, अ‍ॅड. जे. आर. अहिरे, स्वाती अहिरे, अल्लाउद्दीन शेख आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेत ५५ स्वयंसेवकांसह झांजपथक सामील झाले आहे. शहरात ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.