शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजार भरू देणार नाहीत

By admin | Updated: June 3, 2017 00:56 IST

कळवण : १ जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात शेतकऱ्यांनी सहभागी होत संप काळात कोणत्याही शेतमालाची विक्र ी करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : १ जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होत संप काळात कोणत्याही शेतमालाची विक्र ी करणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कळवण तालुक्यातून गुजरात राज्याकडे जाणारे दूध, भाजीपाला वाहतुकीचे वाहने रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनेने व शिवसेनेने दिला आहे. संप काळात तालुक्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय किसान क्र ांती मोर्चा व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी नेते व शेतकरी बांधवांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी अभोणा येथे शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार बंद केला. तालुक्यातील सर्व गावाचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असून, कळवण शहर व तालुक्यात कोणताच आठवडे बाजार भरू द्यायचे नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी बोलून दाखविली. गुरु वारी जयदर येथील आठवडे बाजार बंद करून शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दिला. तसेच अभोणा बाजार बंद केल्यानंतर शनिवारी नवी बेजचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. शेतकरी बांधव संपावर असल्याने अभोणा येथील व्यापारी व व्यावसायिक बांधवांनीदेखील बंद पाळून संप शंभर टक्के यशस्वी करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला असल्याचे अभोणा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ सोनवणे, भाई दादाजी पाटील, नंदकुमार मराठे यांनी सांगितले. कळवण येथील मंडई दुसऱ्या दिवशीही बंद होती. शेतकरी बांधवांनी दूध वाटप बंद केल्याने दुधासाठी कळवणकरांना भटकंती करावी लागली. गुरु वारी रात्री १ वाजेदरम्यान तालुक्यातून गुजरात राज्याकडे भाजीपाला व फळे वाहतूक करणारी वाहने वरखेडा फाटा, दळवट व जिरवाडे येथ; अडवून माघारी पाठविण्यात आली. काही वाहनचालक शेतकऱ्यांमध्ये हमरीतुमरीही झाली. वाहने अडविण्यात आल्याचे समजताच अभोण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फुला यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने जाऊ देण्याची सूचना केली. मात्र शेतकरी बांधव वाहने पुढे जाऊ न देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे पोलीस व आदिवासी शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वरखेडा फाटा येथे पोल्ट्री फॉर्मवरील गाडी अडकवून १५०० कोंबड्या पसार करण्यात आल्याचे समजते.