शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

आंदोलनातही बुधवारचा आठवडे बाजार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:35 IST

शहरात मराठा आंदोलनामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला असताना बुधवारचा आठवडे बाजार मात्र सुरळीत सुरू होता. दूरवरून आलेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने थाटली होती.

नाशिक : शहरात मराठा आंदोलनामुळे बाजारपेठेवर परिणाम झालेला असताना बुधवारचा आठवडे बाजार मात्र सुरळीत सुरू होता. दूरवरून आलेल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने थाटली होती. गोदाघाट ते गणेशवाडी रस्त्यावर विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे दुकाने थाटली होती. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून बुधवारच्या आठवडे बाजारातील व्यवहारावर परिणाम झालेला होता. आंदोलनातही बुधवार बाजारात ग्राहकांचीही गर्दी झाल्याचे दिसून आले.  मराठा क्रांती मोर्चामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद असल्याने सकाळापासूनच गावात सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे बुधवारच्या आठवडे बाजारावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. बाजार भरतो की नाही अशी परिस्थिती असताना दुपारनंतर आंदोलन शिथिल करण्यात आल्याने बाजारात नेहमीप्रमाणे वर्दळ झाली. बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला माल आणण्यात आला होता तर नेहमीप्रमाणेच गोदाघाटाच्या कडेला आणि गणेशवाडी मार्गावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.  नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी नेहमीप्रमाणे शेतमाल घेऊन आले होते. स्थानिक दुकानदारांनीदेखील दुपारी आपली दुकाने थाटली. धान्य बाजारावर मात्र बंदचा परिणाम दिसून आला. आठवडे बाजारातील धान्य बाजारात नेहमीपेक्षा कमी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. काहींनी चारचाकी वाहनांमध्येच धान्याची पोती आणली होती. कापड विक्रेत्यांनीही बाजाराकडे पाठ फिरविली. मात्र भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने नेहमीप्रमाणेच गजबली होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा