शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजारतळ धोकेदायक

By admin | Updated: October 26, 2016 23:15 IST

ओझर : पुलाच्या कठड्यावर भरतो बाजार; विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

सुदर्शन सारडा  ओझरयेथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. यात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असली तरी, हा बाजार मात्र सामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. येथील रस्त्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने भाजीपाला विक्रेते व बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरला आहे.मुंबई - आग्रा महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ अर्ध्याहून अधिक जागेत विक्रेते बसतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. येथील महामार्ग ओलांडणारे नागरिकदेखील जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. महामार्गाचे अर्धवट कामदेखील याला जबाबदार आहे. ग्रामपंचायतीने मागच्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मारुती वेसपासून जरी वाहतूक बंद केली असली तरी बाणगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांवर आता विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अगदी थोड्याथोडक्या जागेत कसेबसे विक्रेते भाजीपाला विकण्यासाठी बसतात. आज ओझरचा सामान्य माणूस महामार्गावरील अपूर्ण कामामुळे त्रस्त आहे.चोरांचा सुळसुळाटबाजारात अनेक चोऱ्या होतात. आतापर्यंत हजारो मोबाइल, पाकीट चोरीला गेले असून, दोन -पाच हजारासाठी कुणी पोलीस स्टेशनमध्ये जात नाही कारण आजपर्यंत बाजारातून चोरी गेलेले सामान परत मिळालेले नाही. महिला आपल्या लहान चिमुकल्यांबरोबरदेखील भाजीपाला विकतात त्यात एखादीच तोल गेला तर सुमारे २० फूटहून अधिक खोल असलेल्या पात्रात पडण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. जर कोणी पडलाच तर याला जबाबदार कोण हादेखील प्रश्न आहे. यात गटारगंगा झालेली बाणगंगादेखील येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करेल हे स्पष्ट आहे. कारण दररोज लाखो डासांची उत्पत्ती बाणगंगामधून होत असते. महामार्गावर तर पोलीसदेखील हतबल असून, गर्दीवर आणि वाहनांवर नियंत्रण मिळवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. मागच्याच ग्रामसभेत स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत देखील बाजार भरविण्याचा विचार झाला. येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमण्याची गरज आहे.