शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

आठवडे बाजारतळ धोकेदायक

By admin | Updated: October 26, 2016 23:15 IST

ओझर : पुलाच्या कठड्यावर भरतो बाजार; विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

सुदर्शन सारडा  ओझरयेथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. यात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असली तरी, हा बाजार मात्र सामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. येथील रस्त्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने भाजीपाला विक्रेते व बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरला आहे.मुंबई - आग्रा महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ अर्ध्याहून अधिक जागेत विक्रेते बसतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. येथील महामार्ग ओलांडणारे नागरिकदेखील जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. महामार्गाचे अर्धवट कामदेखील याला जबाबदार आहे. ग्रामपंचायतीने मागच्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मारुती वेसपासून जरी वाहतूक बंद केली असली तरी बाणगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांवर आता विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अगदी थोड्याथोडक्या जागेत कसेबसे विक्रेते भाजीपाला विकण्यासाठी बसतात. आज ओझरचा सामान्य माणूस महामार्गावरील अपूर्ण कामामुळे त्रस्त आहे.चोरांचा सुळसुळाटबाजारात अनेक चोऱ्या होतात. आतापर्यंत हजारो मोबाइल, पाकीट चोरीला गेले असून, दोन -पाच हजारासाठी कुणी पोलीस स्टेशनमध्ये जात नाही कारण आजपर्यंत बाजारातून चोरी गेलेले सामान परत मिळालेले नाही. महिला आपल्या लहान चिमुकल्यांबरोबरदेखील भाजीपाला विकतात त्यात एखादीच तोल गेला तर सुमारे २० फूटहून अधिक खोल असलेल्या पात्रात पडण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. जर कोणी पडलाच तर याला जबाबदार कोण हादेखील प्रश्न आहे. यात गटारगंगा झालेली बाणगंगादेखील येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करेल हे स्पष्ट आहे. कारण दररोज लाखो डासांची उत्पत्ती बाणगंगामधून होत असते. महामार्गावर तर पोलीसदेखील हतबल असून, गर्दीवर आणि वाहनांवर नियंत्रण मिळवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. मागच्याच ग्रामसभेत स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत देखील बाजार भरविण्याचा विचार झाला. येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमण्याची गरज आहे.