शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

आठवडे बाजारतळ धोकेदायक

By admin | Updated: October 26, 2016 23:15 IST

ओझर : पुलाच्या कठड्यावर भरतो बाजार; विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचा जीव टांगणीला

सुदर्शन सारडा  ओझरयेथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. यात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असली तरी, हा बाजार मात्र सामान्य नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे. येथील रस्त्याचे व्यवस्थापन योग्य नसल्याने भाजीपाला विक्रेते व बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरला आहे.मुंबई - आग्रा महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्सजवळ अर्ध्याहून अधिक जागेत विक्रेते बसतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. येथील महामार्ग ओलांडणारे नागरिकदेखील जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. महामार्गाचे अर्धवट कामदेखील याला जबाबदार आहे. ग्रामपंचायतीने मागच्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मारुती वेसपासून जरी वाहतूक बंद केली असली तरी बाणगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांवर आता विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. अगदी थोड्याथोडक्या जागेत कसेबसे विक्रेते भाजीपाला विकण्यासाठी बसतात. आज ओझरचा सामान्य माणूस महामार्गावरील अपूर्ण कामामुळे त्रस्त आहे.चोरांचा सुळसुळाटबाजारात अनेक चोऱ्या होतात. आतापर्यंत हजारो मोबाइल, पाकीट चोरीला गेले असून, दोन -पाच हजारासाठी कुणी पोलीस स्टेशनमध्ये जात नाही कारण आजपर्यंत बाजारातून चोरी गेलेले सामान परत मिळालेले नाही. महिला आपल्या लहान चिमुकल्यांबरोबरदेखील भाजीपाला विकतात त्यात एखादीच तोल गेला तर सुमारे २० फूटहून अधिक खोल असलेल्या पात्रात पडण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. जर कोणी पडलाच तर याला जबाबदार कोण हादेखील प्रश्न आहे. यात गटारगंगा झालेली बाणगंगादेखील येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करेल हे स्पष्ट आहे. कारण दररोज लाखो डासांची उत्पत्ती बाणगंगामधून होत असते. महामार्गावर तर पोलीसदेखील हतबल असून, गर्दीवर आणि वाहनांवर नियंत्रण मिळवणे त्याच्या आवाक्याबाहेर आहे. मागच्याच ग्रामसभेत स्वामी समर्थ केंद्राच्या समोरील मोकळ्या जागेत देखील बाजार भरविण्याचा विचार झाला. येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमण्याची गरज आहे.