शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

स्कूल चले हम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:44 IST

  सायखेडा : एक महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू होत असल्याने नवीन शालेय वर्षाची सुरुवात करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक संबंधित सर्व घटक सज्ज झाले आहेत.शिक्षण विभाग शाळेचा पहिला दिवस विविध प्रकारच्या उपक्र मांनी साजरा करीत आहे. मशाल फेरी काढून पालकांमध्ये ...

ठळक मुद्देशाळेचा आज पहिला दिवस: शिक्षकांसह पालकांची धावपळ विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

 

 

सायखेडा : एक महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू होत असल्याने नवीन शालेय वर्षाची सुरुवात करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक संबंधित सर्व घटक सज्ज झाले आहेत.शिक्षण विभाग शाळेचा पहिला दिवस विविध प्रकारच्या उपक्र मांनी साजरा करीत आहे. मशाल फेरी काढून पालकांमध्ये जनजागृती करणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे, दखलपात्र विद्यार्थी शोधणे, वर्ग सजावट करून आनंदोत्सव साजरा करणे, शालेय पुस्तकांचे वाटप करणे, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ तयार करून जेवण देणे, प्रभातफेरी काढणे अशा विविध उपक्रमांनी पहिला दिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.या उपक्र मात परिसरातील जिल्हा परिषद, पंचायत सदस्य, सरपंच, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.मुलांना गुलाबपुष्प, मिठाईचे करणार वाटप शालेय शिक्षण प्रवाहात येणारा विद्यार्थी आपले कुटुंब सोडून एका वेगळ्या विश्वात येत असतो. तो त्या ठिकाणी रमला पाहिजे. त्यासाठी दोन दिवसांपासून शालेय इमारत, शालेय आवाराची साफसफाई करण्यात आली आहे. आज त्याचे गुलाबपुष्प, मिठाई देऊन स्वागत करण्यात येणार आहे.शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आठवण निर्माण करणारा असतो, त्याप्रमाणे आपल्या पाल्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी सुरू असून, पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, दाखला काढणे, शाळा निवडणे, वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे यासाठी एकच धावपळ उडाली आहे. अनेक पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने आठवडाभर मजुरीचे काम करून चार पैसे साचवून त्यांनी आपल्या पाल्याची शालेय तयारी केली आहे.