शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणाची वाटचाल शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 19:53 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठयात झपाट्याने वाढ होत असून, गिरणा धरणात शनिवार (दि. १४) सायंकाळी ९३ टक्के पाणीसाठा जमाझाल्याने गिरणा पट्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्देसाकोरा : अकरा वर्षांनंतर प्रथमच भरणार काठोकाठ

साकोरा : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठयात झपाट्याने वाढ होत असून, गिरणा धरणात शनिवार (दि. १४) सायंकाळी ९३ टक्के पाणीसाठा जमाझाल्याने गिरणा पट्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.या धरणात आजच्या साठ्यावर किमान उन्हाळ्यात चार आवर्तने मिळू शकतात. त्यामुळे दोन ते तीन वर्षापासून बारगळलेला रब्बी हंगाम यावर्षी फुलणार आहे. परिणामी या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकऱ्यांमध्ये समाधशनाचे वातावरण पसरले आहे.गिरणा धरणात गत दोन ते तीन वर्षानंतर यावर्षी शेवटी पुन्हा एकदा चांगला जलसाठा झाल्याने गिरणा पट्यातील मळगाव, नरडाणा, बोराळे, आमोदे आदी नाशिक जिल्ह्यातील गावांबरोबरच जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्यात असणाºया अनेक गावातील पिण्याच्या पाण्याबरोबरच जलसिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही शंभर टक्के सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षापासून दुष्काळाचे चटके सहन करणाºया गिरणा पट्टा यंदा हिरवाईने नटणार आहे.चौकट....रब्बीच्या आशा पल्लवितगिरणा धरणाची एकूण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आहे. सद्यस्थितीला धरणात एकूण २० हजार ३२८ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. त्यापैकी ३ हजार वगळता १७ हजार ३२८ एवढा उपयुक्त जलसाठा आहे. म्हणजेच ९३ टक्के एवढा पाणीसाठा आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही काही प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाण्याच्या धीम्या गतीने का होईना आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे.त्यात धरण क्षेत्रातील धरणही भरल्याने पाणी आल्यावर त्यातून विसर्ग सुरू होतो. धरण यंदा शंभर टक्के भरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. २००८ नंतर पहिल्यांदाच गिरणा धरणाची ही स्थिती होण्याचा अंदाज आहे. दरम्यान धरणात दमदार पाणीसाठा असल्याने धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी ही सध्या पाहायला मिळते आहे.पाणीटंचाई मिटलीगिरणा धरणात आत्तापर्यंत ९३ टक्के पाणीसाठा झाल्याने गिरणा पट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे. नांदगाव तालुक्यातील मळगाव, बोराळे, आमोदेसह ५६ खेडी नळ योजना, मालेगाव महानगर पालिका तसेच मालेगाव तालुक्यातील नरडाणे, कळवाडी आदी गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दहिवाळ पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्या असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल पालिका सह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. यामुळे त्या गावांची पाणीटंचाई वर्षभरासाठी दूर झाली आहे गेल्या वर्षी धरणात ४८ टक्के एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षी पाणी टंचाईची झळ सर्व पट्यात मोठ्या प्रमाणात बसली होती. यंदा मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीप्रश्न सुटला आहे.प्रतिक्रि या.....गिरणा धरणातून अजून पाणी सोडण्यात आले नसून कोणीही अफवा पसरवू नये. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिङीयावर गिरणातून पाणी सोडण्यात आल्याचे जुने फोटो आणि माहिती पाठवली जात आहे. त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. आज या धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. संबधित विभागाच्या नियमानुसार या धरणात १५ सप्टेंबर पूर्वी ९६ टक्के पाणीसाठा झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. धरण क्षेत्रात येत्या काही दिवसांत पाणीसाठा वाढल्यास किंवा पाणी सोडण्याची परिस्थीती निर्माण झाल्यास नागरिकांना अधिकृत कळविण्यात येईल.- एस. आर. पाटीलशाखा अभियंता, गिरणा धरण.गिरणा धरणात यावर्षी मुबलक पाणी साठा होणार असून धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी किमान तीन ते चार आवर्तने सोडण्यात येतील. त्याचा सर्वाधिक फायदा आम्हा शेतकºयांना मिळणार असून रब्बी हंगामासाठी त्या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.- नितेंद्र राजपूतशेतकरी, बोराळे, ता. नांदगाव.