शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

गिरणा धरणाची वाटचाल शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 19:53 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठयात झपाट्याने वाढ होत असून, गिरणा धरणात शनिवार (दि. १४) सायंकाळी ९३ टक्के पाणीसाठा जमाझाल्याने गिरणा पट्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्देसाकोरा : अकरा वर्षांनंतर प्रथमच भरणार काठोकाठ

साकोरा : नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाच्या जलसाठयात झपाट्याने वाढ होत असून, गिरणा धरणात शनिवार (दि. १४) सायंकाळी ९३ टक्के पाणीसाठा जमाझाल्याने गिरणा पट्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.या धरणात आजच्या साठ्यावर किमान उन्हाळ्यात चार आवर्तने मिळू शकतात. त्यामुळे दोन ते तीन वर्षापासून बारगळलेला रब्बी हंगाम यावर्षी फुलणार आहे. परिणामी या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकऱ्यांमध्ये समाधशनाचे वातावरण पसरले आहे.गिरणा धरणात गत दोन ते तीन वर्षानंतर यावर्षी शेवटी पुन्हा एकदा चांगला जलसाठा झाल्याने गिरणा पट्यातील मळगाव, नरडाणा, बोराळे, आमोदे आदी नाशिक जिल्ह्यातील गावांबरोबरच जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्यात असणाºया अनेक गावातील पिण्याच्या पाण्याबरोबरच जलसिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही शंभर टक्के सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षापासून दुष्काळाचे चटके सहन करणाºया गिरणा पट्टा यंदा हिरवाईने नटणार आहे.चौकट....रब्बीच्या आशा पल्लवितगिरणा धरणाची एकूण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढी आहे. सद्यस्थितीला धरणात एकूण २० हजार ३२८ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. त्यापैकी ३ हजार वगळता १७ हजार ३२८ एवढा उपयुक्त जलसाठा आहे. म्हणजेच ९३ टक्के एवढा पाणीसाठा आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही काही प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाण्याच्या धीम्या गतीने का होईना आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढत आहे.त्यात धरण क्षेत्रातील धरणही भरल्याने पाणी आल्यावर त्यातून विसर्ग सुरू होतो. धरण यंदा शंभर टक्के भरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. २००८ नंतर पहिल्यांदाच गिरणा धरणाची ही स्थिती होण्याचा अंदाज आहे. दरम्यान धरणात दमदार पाणीसाठा असल्याने धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी ही सध्या पाहायला मिळते आहे.पाणीटंचाई मिटलीगिरणा धरणात आत्तापर्यंत ९३ टक्के पाणीसाठा झाल्याने गिरणा पट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघाला आहे. नांदगाव तालुक्यातील मळगाव, बोराळे, आमोदेसह ५६ खेडी नळ योजना, मालेगाव महानगर पालिका तसेच मालेगाव तालुक्यातील नरडाणे, कळवाडी आदी गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दहिवाळ पाणीपुरवठा योजना जिवंत झाल्या असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल पालिका सह १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. यामुळे त्या गावांची पाणीटंचाई वर्षभरासाठी दूर झाली आहे गेल्या वर्षी धरणात ४८ टक्के एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षी पाणी टंचाईची झळ सर्व पट्यात मोठ्या प्रमाणात बसली होती. यंदा मात्र धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीप्रश्न सुटला आहे.प्रतिक्रि या.....गिरणा धरणातून अजून पाणी सोडण्यात आले नसून कोणीही अफवा पसरवू नये. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिङीयावर गिरणातून पाणी सोडण्यात आल्याचे जुने फोटो आणि माहिती पाठवली जात आहे. त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. आज या धरणात ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. संबधित विभागाच्या नियमानुसार या धरणात १५ सप्टेंबर पूर्वी ९६ टक्के पाणीसाठा झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. धरण क्षेत्रात येत्या काही दिवसांत पाणीसाठा वाढल्यास किंवा पाणी सोडण्याची परिस्थीती निर्माण झाल्यास नागरिकांना अधिकृत कळविण्यात येईल.- एस. आर. पाटीलशाखा अभियंता, गिरणा धरण.गिरणा धरणात यावर्षी मुबलक पाणी साठा होणार असून धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी किमान तीन ते चार आवर्तने सोडण्यात येतील. त्याचा सर्वाधिक फायदा आम्हा शेतकºयांना मिळणार असून रब्बी हंगामासाठी त्या आवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे.- नितेंद्र राजपूतशेतकरी, बोराळे, ता. नांदगाव.