शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भाव नसल्याने टरबूज झाले मेंढ्यांचे खाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 16:52 IST

खामखेडा : योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या टरबूज पिकाच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टरबूजचे पीक घेतले. टरबूज काढणीसाठी तयार झाले आणि आचनक भाव कोसळल्याने ते शेतातून काढून बाजारात विकून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकºयांनी टरबूज मेंढ्यांसमोर टाकले आहे. मेंढपाळ टरबूज फोडून मेंढ्यांना खाऊ घालत आहेत.

ठळक मुद्दे वृक्षांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडांच्या पाल्यावर मेंढीची भूक भागवावी लागत आहे. यंदा उन्हाळ्याच्या दिवसात मेंढ्यांना बाभळीचा पाला-शेंगा चारून कसातरी मे महिना काढला. चालू वर्षी सुरुवातीला चंगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती; परंतु जून महिना सुरू ल

खामखेडा : योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या टरबूज पिकाच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन टरबूजचे पीक घेतले. टरबूज काढणीसाठी तयार झाले आणि आचनक भाव कोसळल्याने ते शेतातून काढून बाजारात विकून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकºयांनी टरबूज मेंढ्यांसमोर टाकले आहे. मेंढपाळ टरबूज फोडून मेंढ्यांना खाऊ घालत आहेत. त्यांच्या मोबदल्यात मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा वाडा शेतकºयाच्या शेतात बसवत आहे. यातून शेतात खत म्हणून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात ज्वारीचा हिरवा कडबा आहे तो चारा मेंढपाळांना देऊन रात्रभर मेंढ्या शेतात बसवल्या जातात. यावर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने पाण्याबरोबर चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याने मेंढपाळ व्यवसाय धोक्यात आला आहे. दोन-तीन दिवसात मृग नक्षत्राला सुरुवात होईल मात्र पावसाचे चिन्हे नाही. खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे कांद्याची पात चारण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाहेर गावचे मेंढपाळ मेंढ्या घेऊन येथे येतात. साधारण एप्रिल माहिन्यापासून कांदा काढणीला सुरुवात होते. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरींना पाणी राहणार नाही म्हणून शेतकºयांनी उन्हाळी कांद्याची लवकर लागवड केली परिणामी काढणी लवकर झाली. एप्रिल महिना संपण्याच्या आतच कांदा काढणी झाल्याने मेंढ्यांसाठी चारा शिल्लक राहिला नाही. तसेच या परिसरातील काही शेतकरी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करीत असे. भुईमुगाची काढणीला साधारण मे महिन्यात सुरु वात होते. तेव्हा भुईमुगाच्या शेतातील गवत व पालापाचोळा मेंढ्यांसाठी चारा म्हणून मिळत असे. त्यामुळे मेंढपाळांचा प्रश्न सुटत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून विहिरींना पाणी नसल्याने उन्हाळी भुईमुगाचे पीक शेतकरी करीत नाही. त्यामुळे यावर्षी मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात चाराटंचाई जाणवू लागली आहे. खामखेडा परिसरात दाखल मेंढ्यांचे चारा-पाण्याअभावी हाल होत आहे.मागच्या वर्षी कांद्याला भाव नसल्याने मेंढपाळ मेंढ्यांसाठी खराब कांदे विकत घेऊन खाद्य म्हणून उपयोग करीत होते. यावर्षी खराब कांद्यालाही भाव असल्याने महाग कांदा विकत घेऊन मेंढ्यांना खायला घालणे परवडत नाही. पूर्वी शेतात गावठी बाभळाची लिंबाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे लिंब-बाभळीच्या पाल्यावर भागत असे. परंतु आता वृक्षांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडांच्या पाल्यावर मेंढीची भूक भागवावी लागत आहे. यंदा उन्हाळ्याच्या दिवसात मेंढ्यांना बाभळीचा पाला-शेंगा चारून कसातरी मे महिना काढला. चालू वर्षी सुरुवातीला चंगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती; परंतु जून महिना सुरू लागूनही पावसाचे काही चिन्हे नाही. त्यामुळे मेंढीपालन व्यवसाय धोक्यात आला आहे.