शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वडाळागावात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:00 IST

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले.

ठळक मुद्देप्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले. हे संकट पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अधिक भयावह झाल्याचे चित्र गुरुवारी (दि.५) सकाळी पहावयास मिळाले. पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड उडाली, तर एका भागात संतप्त महिलांनी रिकामे हंडे टॅँकरच्या दिशेने भिरकावत महापालिके च्या गलथान कारभाराचा निषेधही नोंदविला.जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने ज्या भागांमधील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर या दुरुस्ती कालावधीत परिणाम होणार आहे, त्या परिसराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले; मात्र याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिकाºयांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच कुटुंबांमधील सर्वच सदस्य पाण्याच्या शोधात हंडे, कळशी, बादली घेऊन घराबाहेर भटकंती करताना बुधवारपासून दिसून येत आहे. ज्या भागात टॅँकर पोहचला त्या भागात धाव घेऊन मिळेल तेवढे पाणी घेत घर गाठायचे असा जणू उपक्रमच बुधवारपासून दोन दिवस वडाळावासीयांचा सुरू होता. अपुरे टॅँकर आणि त्यामुळे उद्भवणारे भांडण सोडविताना नगरसेवकांच्याही नाकीनव आले. काही परिसरात नगरसेवकांना महिलांच्या रोषाचा सामनाही करावा लागल्याचे दिसून आले. अवघे दोन टॅँकरद्वारे वडाळागावाची तहान भागाविण्याचा पोरखेळपणा महापालिकेच्या प्रशासनाने केला हे विशेष! यामुळे ओढावलेले जलसंकट अधिक वाढले आणि नागरिकांचा संतापही यामुळे दिसून आला. ज्या भागात टॅँकर पोहचले त्या भागातील लोक आनंदी मात्र दुसºया भागातील लोकांनी तिकडे धाव घेतल्यास आपापसांत भांडण होऊन हंड्यांची फेकाफेकही झाली.आज हवा पुरेसा पाणीपुरवठादोन दिवसांपासून वडाळागाव परिसरात पाणीपुरवठा बंद होता, त्यामुळे वडाळागावात शुक्रवारी तरी जादा दाबाने व पुरेशा वेळेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही, याबाबत प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. दोन दिवसांपासून ‘पाणीबाणी’ वडाळावासीयांवर झाल्यामुळे शुक्रवारच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देण्याची किंवा सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.