शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

वडाळागावात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:00 IST

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले.

ठळक मुद्देप्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वडाळावासीयांवर दोन दिवसीय जलसंकट ओढावले. हे संकट पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अधिक भयावह झाल्याचे चित्र गुरुवारी (दि.५) सकाळी पहावयास मिळाले. पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षेनंतर गावात येणाºया टॅँकरवर महिलांची झुंबड उडाली, तर एका भागात संतप्त महिलांनी रिकामे हंडे टॅँकरच्या दिशेने भिरकावत महापालिके च्या गलथान कारभाराचा निषेधही नोंदविला.जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने ज्या भागांमधील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर या दुरुस्ती कालावधीत परिणाम होणार आहे, त्या परिसराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले; मात्र याबरोबरच पर्यायी व्यवस्था करण्याचा विसर संंबंधित अधिकाºयांना पडल्यामुळे वडाळागाव परिसरात पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे दोन दिवसांपासून आतोनात हाल होत आहे. लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंतच कुटुंबांमधील सर्वच सदस्य पाण्याच्या शोधात हंडे, कळशी, बादली घेऊन घराबाहेर भटकंती करताना बुधवारपासून दिसून येत आहे. ज्या भागात टॅँकर पोहचला त्या भागात धाव घेऊन मिळेल तेवढे पाणी घेत घर गाठायचे असा जणू उपक्रमच बुधवारपासून दोन दिवस वडाळावासीयांचा सुरू होता. अपुरे टॅँकर आणि त्यामुळे उद्भवणारे भांडण सोडविताना नगरसेवकांच्याही नाकीनव आले. काही परिसरात नगरसेवकांना महिलांच्या रोषाचा सामनाही करावा लागल्याचे दिसून आले. अवघे दोन टॅँकरद्वारे वडाळागावाची तहान भागाविण्याचा पोरखेळपणा महापालिकेच्या प्रशासनाने केला हे विशेष! यामुळे ओढावलेले जलसंकट अधिक वाढले आणि नागरिकांचा संतापही यामुळे दिसून आला. ज्या भागात टॅँकर पोहचले त्या भागातील लोक आनंदी मात्र दुसºया भागातील लोकांनी तिकडे धाव घेतल्यास आपापसांत भांडण होऊन हंड्यांची फेकाफेकही झाली.आज हवा पुरेसा पाणीपुरवठादोन दिवसांपासून वडाळागाव परिसरात पाणीपुरवठा बंद होता, त्यामुळे वडाळागावात शुक्रवारी तरी जादा दाबाने व पुरेशा वेळेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही, याबाबत प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे. दोन दिवसांपासून ‘पाणीबाणी’ वडाळावासीयांवर झाल्यामुळे शुक्रवारच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ वाढवून देण्याची किंवा सकाळ-संध्याकाळ पाणीपुरवठा करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.