शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पाणीबाणी : नाशिकरोडसह पूर्व विभागात नागरिकांचे हाल महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:50 IST

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले.

ठळक मुद्देपूर्व विभागातील प्रभागांमधील नागरिकांचे प्रचंड हालपरंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन इंडिगो पार्कजवळ नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले. परंतु, दुरुस्ती कामाचा अंदाज न आल्याने मनपाच्या या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे, दि. ३ ते ५ एप्रिलपर्यंत सलग तीन दिवस नाशिकरोड आणि पूर्व विभागातील प्रभागांमधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (दि.६) कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी मुख्य सीमेंटची पाइपलाइन सोमवारी (दि.२) नादुरुस्त झाली होती. त्यानुसार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर परिपत्रक काढून दि. ३ एप्रिल रोजी नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक १६, १७, १८, १९, २०, आणि पूर्व विभागातील २१, २२, २३ आणि ३० मध्ये दिवसभर पाणीपुरवठा होणार नसल्याचे नागरिकांना कळविले. पाणीपुरवठा विभागाने सदर पाइपलाइन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे होते. परंतु, दुरुस्त कामासंदर्भात निर्णय घेण्यासच विलंब लागला गेला आणि मंगळवारी कामच झाले नाही. त्यामुळे, बुधवारी (दि.४) कामास सुरुवात झाली.परिणामी, बुधवारीही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान, दुरुस्ती कामातील गुंतागुंत वाढत गेल्याने गुरुवारी (दि.५)देखील महापालिकेला सदर भागात पाणीपुरवठा करता आला नाही. पाणीपुरवठा विभागाने सदर कामाचा अंदाज घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु, ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आणि सलग तीन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवशी नागरिकांनी साठविलेल्या पाण्याचा कसाबसा वापर केला. परंतु, सलग तिसऱ्या दिवशी पाणी न आल्याने गुरुवारी (दि.५) मात्र नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांना खासगी टॅँकर मागवून पाण्याची सोय करावी लागली, तर नाशिकरोड विभागीय कार्यालयाकडून वाहनचालक नसल्याचे उत्तर ऐकायला मिळाले.सलग तीन दिवस पाणीपुरवठा होऊ न शकल्याने पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे. सदर पाइपलाइन ही सीमेंटची असल्याने सावधपणे काम करणे आवश्यक होते. जराशी कुठे चूक झाली असती तर इतर पाइपलाइनला धोका होता. दोन दिवसांत महापालिकेकडे पाणीपुरवठ्या संदर्भात सुमारे ४० तक्रारी आल्या. याशिवाय, महापालिकेच्या आठ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.