शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

साधुग्राममध्ये पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: September 8, 2015 23:49 IST

साधुग्राममध्ये पाण्याचा अपव्यय

नाशिक : एकीकडे शहरावर पाणी कपातीचे संकट असताना साधुग्राम परिसरात मात्र काही ठिकाणी पाण्याचे नळ धो धो वाहताना दिसतात. शहर परिसरातील सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर भागात कमी दाबाने पाणी येत असताना साधुग्राममध्ये मात्र २४ तास पाण्याचे नळ सुरू असल्याने वाया जाणाऱ्या पाण्याकडे पाणीपुरवठा विभागासह कोणाचेच लक्ष नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ ५८ टक्के पाणी साठा असल्याने पावसाची अवकृपा झाल्यास शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे करोडो रुपये खर्चून साधुग्राममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने वीज, पाणी, रस्ते आदिंसह सर्व मूलभूत सोयी पुरविण्यात आल्या असल्या तरी, सर्व काही मोफत मिळत असल्याने त्याची कोणाला किंमत नाही किंबहुना पर्वादेखील दिसत नाही.सेक्टर- २ मध्ये अनेक खालशांजवळ अशीच नळगळती सुरू आहे. अनेक खालशांमध्ये साधू-महंतांसाठी स्नानाच्या व्यवस्थेसाठी तात्पुरते बाथरूम तयार करण्यात आल्याने त्याठिकाणी नळांची गळती सुरूच दिसते. तर शौचालये मात्र पाणी न टाकल्याने घाणीने भरलेले दिसतात. सेक्टर तीन व चारमध्ये फारशी गर्दी नसल्याने तिकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जणू काही बेवारसपणे नळ सुरू असतात. तपोवन पोलीस चौकीलगतच पाण्याची टाकी असून, याठिकाणी पिण्याच्या पाण्याला शुद्धीकरण यंत्र बसवून पुरवठा केला जातो. मात्र भाविक हातपाय धुणे, तोंड धुणे यासाठी सतत नळ सुरू ठेवतात. परंतु तेथे उभे असलेले मनपा कर्मचारी, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते किंवा पोलीस कुणीही याबाबत हटकत नाही.