शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: February 24, 2016 00:04 IST

पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय

पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाने दर आठवड्याला शहरातील एका भागात संपूर्ण दिवसभर पाणीकपात जाहीर केली आहे. पंचवटीतदेखील दर गुरुवारी पाणीकपात केलेली असली तरी सध्या पंचवटी परिसरात सुरू असलेली नवीन बांधकामे, वाहन सर्व्हिस स्टेशन, तसेच सार्वजनिक स्टॅँडपोस्ट व महापालिकेच्या जलवाहिन्यांना लागलेली गळती यामुळे दैनंदिन हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाने एकीकडे पाणी जपून वापरण्याबाबत आवाहन केले असले, तरी नागरिकांनी मात्र मनपाच्या या आवाहनावर पाणी फिरवले असल्याचे बघायला मिळत आहे. पंचवटी परिसरात नव्याने अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी दैनंदिन पाणी मारण्याचे काम केले जातेच शिवाय दुचाकीच्या सर्व्हिस स्टेशनवर वाहने धुण्याच्या नावाखाली शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याचाच अपव्यय होत आहे. पंचवटीत अनेक ठिकाणी महापालिकेचे स्टॅँडपोस्ट असून, या स्टॅँडपोस्टवर पिण्याचे पाणी भरण्याबरोबरच महिलावर्ग धुणी-भांडी करत असल्याचे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. हिरावाडीतील भिकुसा पेपर मिलमागे असलेल्या जलवाहिनीला गेल्या अनेक महिन्यांपासून गळती लागल्याने दैनंदिन हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. जलवाहिनी नादुरुस्त असल्याने २४ तास पिण्याचे पाणी वाया जाते. सदरची बाब लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी अनेकदा मनपाच्या निदर्शनास आणून दिली; मात्र मनपा प्रशासन जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या कामाकडे उघडपणे डोळेझाक करत असल्याने पाणी गळती थांबणार कशी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)