शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: September 22, 2015 22:52 IST

कालवा चारी फोडल्याने पाण्याचा अपव्यय

देवळा : चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातील पाणी सोडल्यानंतर कालवा फोडण्याचे किंवा चारीचे गेट उघडून देण्याच्या घटना दरवर्षी सातत्याने घडत आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो क्यूसेक पाणी वाया जाते व रामेश्वर धरण भरण्यास विलंब झाल्याने तालुक्याचा पूर्व भाग पाण्यापासून वंचित राहतो आहे; मात्र याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याने अशा गैरप्रकारांमध्ये वाढ होत आहे. रविवारी (दि. २०) चणकापूर उजव्या कालव्याला चणकापूर धरणातील पूरपाणी सोडल्यानंतर वरवंडी येथे ११ नंबरच्या चारीचे गेट अज्ञात इसमांनी फोडल्याने रामेश्वर धरणात कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद झाला. सोमवारी दुपारी देवळा व कळवण येथील पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ११ नंबरची चारी बंद केल्यानंतर कालव्याला पूर्ववत पाणी वाहू लागले. यामुळे रामेश्वर धरण लवकर भरून कोलती नदीला पाणी येईल, या प्रतीक्षेत येथील ग्रामस्थ आहेत.तालुक्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. रामेश्वर धरण वगळता वार्शी, दोडी, कोलते, वडाळा, कनकापूर येथील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. चणकापूर उजवा कालवा सुरळीतपणे चालल्यास रामेश्वर धरण लवकरच १०० टक्के भरेल् अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील वरवंडी येथे पाऊस झाल्यानंतर डोंगरउतारावरील पाणी वाहून जाण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यावर बांधलेली भूमिगत मोरी गाळाने भरून बंद झाल्यामुळे डोंगरउतारावरील सर्व पाणी कालव्यात वाहून जात असल्याने वरवंडी गावाला नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून, जुन्या मोरीच्या जागेवर अधिक क्षमतेची नवीन मोरी (सुपर पॅसेंजर) बांधण्याची मागणी केली आहे. चारी नं. ११ शेजारी असलेली मोरीदेखील गाळाने भरली. या नाल्यावर पुढे सात नालाबांध पद्धतीचे बंधारे आहेत. परंतु डोंगराचे पाणी अडवले जाऊन ते उजव्या कालव्यात वाहून जाते. यामुळे हे नालाबांधदेखील कायम कोरडेच राहतात. मोरीच्या सदोष कामामुळे ह्या नालाबांधासाठी शासनाने केलेला खर्चदेखील वाया गेला असून, कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर वरवंडी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या मोरीशेजारीच भाऊसाहेब आहेर यांची (गट नं. ६) शेती आहे. मोरी गाळाने भरल्याने डोंगरउतारावरील पाणी त्यांच्या शेतात शिरत असल्याने त्यांचे सोयाबीन व बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे. असे नुकसान त्यांना दरवर्षी सोसावे लागते. पाण्यामुळे कालव्याचेही अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. भर वाहून गेल्याने काही जागांवर भगदाड पडली आहेत. डोंगरउतारावरून वाहून येणारा गाळ कालव्यात साठत असल्याने आधीच कमी असलेली कालव्याची वहनक्षमता आणखी कमी होऊ शकते. मोठा पाऊस झाला व अधिक क्षमतेने कालव्याला पाणी सोडल्यास कालव्याला धोका निर्माण होऊ शकतो. सदरचा कालवा तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. यापूर्वी वरवंडी ग्रामपंचायतीने मोरी दुरुस्त करण्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव दिला असून, अनेक वेळा तक्रारी करूनही पाटबंधारे विभाग यासंबंधी ठोस पावले उचलत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. (वार्ताहर)