शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर दहा तालुक्यांत टँकरद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

नाशिक: मागील वर्षी मुबलक पाऊस होऊनही जिल्ह्यातील ७२ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा ...

नाशिक: मागील वर्षी मुबलक पाऊस होऊनही जिल्ह्यातील ७२ गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सद्यस्थितीत दहा तालुक्यांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. शुक्रवारी बागलाणमध्ये एक टँकर सुरू करण्यात आला.

मागील मोसमात जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे भरली होती. त्यामुळे नदी, नाले, विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढल्याने यंदा टचाईच्या झळा बसणार नाहीत, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु मे महिन्यातील पंधरवड्यानंतर विहिरींनी तळ गाठल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीव्र उन्हामुळे टंचाईत अधिक भर पडल्याने पाण्यासाठी वणवण सुरू झाली.

नदी, नाले आटले तर विहीरींनी तळ गाठल्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या टँकरच्या संख्येत या महिन्यात चारने वाढली असून, एकूण टँकरची संख्या ५६ इतकी झाली आहे.

सध्या टँकर सुरू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये येवला आणि सुरगाण्यामध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत. येवल्यात २८ तर सुरगाण्यात १२ टँकर सुरू आहेत. येवल्यात २८ गावे आणि १९ वाड्या तर सुरगाण्यात १२ गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ आणि चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ८ याप्रमाणे टँकर सुरू आहेत.

जिल्ह्यात सध्या बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, येवला या तालुक्यांमधील ७२ गावे, ५१ वाडे यांना एकूण ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ७ शासकीय तर ४९ खासगी टँकरचा समावेश आहे.

--इन्फाे--

७० विहिरी अधिगतहित

जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील १२३ ठिकाणी सुरू असलेल्या टँकर्सबरोबरच काही ठिकाणी विहीरी देखील अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत. ५३ विहिरी या गावांसाठी तर १७ विहिरी या टँकरला पाणीभरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातून जिल्ह्यातील टंचाई जाणवत असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.