शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा

By admin | Updated: August 7, 2015 23:47 IST

सुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकी

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठासुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकीनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीतील आखाड्यांना यंदा टॅँकरने पाणीपुरवठा न करता जलशुद्धिकरण केंद्रातून थेट जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे. प्रत्येक आखाड्यांमध्ये २५ हजार लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्याने आखाड्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येथील जनतेला, साधू-महंत व भाविकांना पुरेसे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या आणि येथे येणारे भाविक, साधू-महंत अशा अंदाजे २५ लक्ष जणांसाठी ५४.८५ लक्ष लिटर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यात त्र्यंबकेश्वर शहर, आखाडे, साधुग्राम, इतर तंबू व आखाडे, वेळेवर येणारे साधू, भाविक आणि पोलिसांचा समावेश आहे.कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणा, शहरातील अंतर्गत जलवाहिन्या, आखाड्यांना थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा आणि गौतमी गोदावरी धरणावरून २.६० दशलक्ष लिटर्स क्षमतेची पाणीपुरवठा योजना, जुन्या योजनेची दुरुस्ती तसेच नील पर्वतावरील जलशुद्धिकरण केंद्रासाठी जीवन प्राधिकरण विभागाने ३०.३२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणेची चाचणीदेखील पूर्ण झाली असून, पर्वणी काळात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात ज्या भागात पाण्याची वितरण व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकल्यामुळे नागरिकांनादेखील पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.४त्र्यंबकेश्वरशिवाय कावनई, पेगलवाडी, सप्तशृंग गडावरही जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्राधिकरणामार्फत नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या महामार्गांवर ओझर, चांदवड, इगतपुरी येथे प्याऊची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूणच सिंहस्थ कुंभमेळा काळात त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या भाविक, साधू-महंतांना पाण्याची कुठलीही कमतरता जाणवू नये याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे. ४शहरातील १० आखाड्यांमध्ये पूर्वी पाण्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या, तेथे टॅँकरने किंवा नळाने पाणीपुरवठा केला जात असे; मात्र आता प्रत्येक आखाड्यासाठी जलशुद्धिकरण केंद्रातून थेट पाइपलाइन टाकण्यात आली असून, महंत व साधूंची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक आखाड्याकरिता २५ हजार लिटर्स क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.