शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा

By admin | Updated: August 7, 2015 23:47 IST

सुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकी

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठासुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकीनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीतील आखाड्यांना यंदा टॅँकरने पाणीपुरवठा न करता जलशुद्धिकरण केंद्रातून थेट जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे. प्रत्येक आखाड्यांमध्ये २५ हजार लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्याने आखाड्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येथील जनतेला, साधू-महंत व भाविकांना पुरेसे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या आणि येथे येणारे भाविक, साधू-महंत अशा अंदाजे २५ लक्ष जणांसाठी ५४.८५ लक्ष लिटर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यात त्र्यंबकेश्वर शहर, आखाडे, साधुग्राम, इतर तंबू व आखाडे, वेळेवर येणारे साधू, भाविक आणि पोलिसांचा समावेश आहे.कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणा, शहरातील अंतर्गत जलवाहिन्या, आखाड्यांना थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा आणि गौतमी गोदावरी धरणावरून २.६० दशलक्ष लिटर्स क्षमतेची पाणीपुरवठा योजना, जुन्या योजनेची दुरुस्ती तसेच नील पर्वतावरील जलशुद्धिकरण केंद्रासाठी जीवन प्राधिकरण विभागाने ३०.३२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणेची चाचणीदेखील पूर्ण झाली असून, पर्वणी काळात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात ज्या भागात पाण्याची वितरण व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकल्यामुळे नागरिकांनादेखील पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.४त्र्यंबकेश्वरशिवाय कावनई, पेगलवाडी, सप्तशृंग गडावरही जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्राधिकरणामार्फत नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या महामार्गांवर ओझर, चांदवड, इगतपुरी येथे प्याऊची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूणच सिंहस्थ कुंभमेळा काळात त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या भाविक, साधू-महंतांना पाण्याची कुठलीही कमतरता जाणवू नये याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे. ४शहरातील १० आखाड्यांमध्ये पूर्वी पाण्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या, तेथे टॅँकरने किंवा नळाने पाणीपुरवठा केला जात असे; मात्र आता प्रत्येक आखाड्यासाठी जलशुद्धिकरण केंद्रातून थेट पाइपलाइन टाकण्यात आली असून, महंत व साधूंची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक आखाड्याकरिता २५ हजार लिटर्स क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.