शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा

By admin | Updated: August 7, 2015 23:47 IST

सुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकी

त्र्यंबकेश्वर आखाड्यांसाठी थेट पाइपलाइनने पाणीपुरवठासुविधा : प्रत्येक आखाड्यात बसवली २५ हजार लिटर्सची टाकीनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरनगरीतील आखाड्यांना यंदा टॅँकरने पाणीपुरवठा न करता जलशुद्धिकरण केंद्रातून थेट जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे. प्रत्येक आखाड्यांमध्ये २५ हजार लिटर्स क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्याने आखाड्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येथील जनतेला, साधू-महंत व भाविकांना पुरेसे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहराची लोकसंख्या आणि येथे येणारे भाविक, साधू-महंत अशा अंदाजे २५ लक्ष जणांसाठी ५४.८५ लक्ष लिटर पाण्याचे नियोजन केले आहे. त्यात त्र्यंबकेश्वर शहर, आखाडे, साधुग्राम, इतर तंबू व आखाडे, वेळेवर येणारे साधू, भाविक आणि पोलिसांचा समावेश आहे.कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणा, शहरातील अंतर्गत जलवाहिन्या, आखाड्यांना थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा आणि गौतमी गोदावरी धरणावरून २.६० दशलक्ष लिटर्स क्षमतेची पाणीपुरवठा योजना, जुन्या योजनेची दुरुस्ती तसेच नील पर्वतावरील जलशुद्धिकरण केंद्रासाठी जीवन प्राधिकरण विभागाने ३०.३२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. कुशावर्त कुंडातील जलशुद्धिकरण यंत्रणेची चाचणीदेखील पूर्ण झाली असून, पर्वणी काळात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. शहरात ज्या भागात पाण्याची वितरण व्यवस्था नाही अशा ठिकाणी जलवाहिन्या टाकल्यामुळे नागरिकांनादेखील पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.४त्र्यंबकेश्वरशिवाय कावनई, पेगलवाडी, सप्तशृंग गडावरही जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्राधिकरणामार्फत नाशिक-त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या महामार्गांवर ओझर, चांदवड, इगतपुरी येथे प्याऊची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूणच सिंहस्थ कुंभमेळा काळात त्र्यंबकेश्वर नगरीत येणाऱ्या भाविक, साधू-महंतांना पाण्याची कुठलीही कमतरता जाणवू नये याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील आहे. ४शहरातील १० आखाड्यांमध्ये पूर्वी पाण्याच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या, तेथे टॅँकरने किंवा नळाने पाणीपुरवठा केला जात असे; मात्र आता प्रत्येक आखाड्यासाठी जलशुद्धिकरण केंद्रातून थेट पाइपलाइन टाकण्यात आली असून, महंत व साधूंची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक आखाड्याकरिता २५ हजार लिटर्स क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी सांगितले.