शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

त्र्यंबकला दररोज पाणीपुरवठा

By admin | Updated: July 30, 2014 00:23 IST

अंबोली धरण भरले : नगराध्यक्षांचे आदेश; पाऊस झाल्याने संकट टळले

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण पूर्णत: भरल्याने शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे ठरलेल्या वेळेत दररोज करण्याचे आदेश नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलावर्गाची होणारी गैरसोय टळली आहे. आतापर्यंत एकूण ४५६ मि.मी. पाऊस झाला आहे.त्र्यंबक शहरात असणाऱ्या अहिल्या धरणाचा व अंबोली येथील ल.पा. बंधाऱ्याच्या पाण्याचा शहरासाठी वापर करण्यात येत असतो. तथापि, अहिल्या धरणातील पाणी पाच आळी, गढई आदि अहिल्या धरणाजवळील वसाहतीसाठी होत असतो. कारण अंबोली धरणातील पाणी पाच आळीपर्यंत कमी दाबाने होत येते. अंबोलीचे पाणी सर्व शहरात वापरले जाते. साधारणत: मे-जूनमध्ये पाणी कमी झाल्याने अगोदरच दिवसाआड आणि त्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची पाळी नगरपालिकेवर आली होती. कदाचित तीन दिवसांआड पाणीपुरवठा होईल अशी शक्यता असतानाच वरुणराजा मेहेरबान झाला. धरणाच्या पाण्याची पूजा केल्यानंतर दोन दिवसांवरून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आणि गेल्या चार दिवसांपासूनच्या पावसाचे सातत्य टिकले आहे. त्यामुळे मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, असा अहवाल पाणीपुरवठा प्रमुख बाळ फसाळे यांनी दिला. यामुळे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी कार्यालयीन आदेश देऊन दररोज पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)