शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दलित वस्ती सुधार योजनेतीलपाणीपुरवठ्याची कामे प्राधान्यक्रमावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:27 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.

ठळक मुद्देरस्ता कॉँक्रिटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांपैकी दलित वस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती घेतली. अपूर्ण कामांचा तपशील आणि कामांना होणाºया विलंबाबतही त्यांनी अधिकाºयांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताना प्रलंबित मानधन आणि मानधनाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकूण ३६.११ कोटींचे ९१६ प्रस्ताव प्राप्त झालेले असून, प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर सदर परिपूर्ण असलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्णात दुष्काळाचे सावट असल्याने दलित वस्ती सुधार योजनेत दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.नाशिक तालुक्यातील गणेशगाव येथील रस्ता कॉँक्रिटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार हिरामण खोसकर यांनी केली. या कामांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.या बैठकीस हिरामण खोसकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, रमेश बरफ, कन्हू गायकवाड, विद्या पाटील, शोभा कडाळे उपस्थित होते. दर्जा राखण्याची सूचनादलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कामांची गुणवत्ता व कामांची तपासणी होत नसल्यामुळे अनेक कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे केलेल्या कामांचा लवकर बोजवारा उडतो आणि केलेल्या कामांचा लाभदेखील होत नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत होणाºया कामांचा दर्जा राखला जावा, अशी सूचना चारोस्कर यांनी यावेळी केली.