शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पाणीपुरवठा योजनांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:24 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा तडाखा : शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.प्राप्त झालेल्या तक्रारीवरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने, पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली असता त्यात निफाड तालुक्यातील १८ गावांमधील योजनांचे नुकसान झाले तर देवळा तालुक्यातील एका योजनेला पावसाचा फटका बसला आहे.सिन्नर तालुक्यातील गावांमधील ११ योजनांचे नुकसान झाले आहे. नाशिक तालुक्यातील १० गावांमधील योजनांना पावसाचा फटका बसला असून, या सगळ्याच योजनांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १३ लाख ६९ हजार रुपयांची गरज आहे. असे असतानाच दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्णाला पुन्हा झोडपून काढल्यामुळे त्याचा फटका चांदवड तालुक्यातील दहेगाव-मनमाड पाणीपुरवठा योजनेला बसला आहे.योजनेचा उद्भव असलेल्या विहिरीच्या आजूबाजूचा काँक्रीटचा भराव वाहून गेला आहे. तसेच पंपिंग हाउसच्या बाजूचाही भराव वाहून गेला. तीन इंच व्यासाची शंभर मीटर लांबीची पाइपलाइन वाहून गेली. या योजनेचे एकूण सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. सटाणा तालुक्यातील निताणे येथील योजनेच्या विहिरीचे कंपाउंड पावसाने वाहून गेले आहे.मोसम नदीच्या काठावर ही विहीर असून त्याचेही दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव ताालुक्यातील सौंदाणे पाणीपुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. गलाटी नदीचे पाणी गावात शिरल्याने योजनेला फटका बसला असून, दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासंदर्भात नुकसानाची अहवाल शासनाकडे सादर केला असून, दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी ही करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनीदिली.नदीकाठच्या शेतमालाचे मोठे नुकसानजिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले असले तरी, जुलै अखेरीस त्याने दमदार हजेरी कायम ठेवली. त्यामुळे आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन नद्या, नाल्यांना पूर आले. त्यातही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदीला महापूर येऊन नदीकाठच्या गावांमधील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पुराचा फटका शेतमालासह जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांनाही बसला.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषण