शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पाणीपुरवठा योजनांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:24 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा तडाखा : शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या टप्प्यात ४० तर अवकाळीच्या तडाख्याने ३ अशा एकूण ४३ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा तडाखा व पुरामुळे पाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याबरोबरच काही योजनांचे पाईपच वाहून गेले आहेत. त्यामुळे या योजनांच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार आहे.प्राप्त झालेल्या तक्रारीवरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने, पाणीपुरवठा योजनांची पाहणी केली असता त्यात निफाड तालुक्यातील १८ गावांमधील योजनांचे नुकसान झाले तर देवळा तालुक्यातील एका योजनेला पावसाचा फटका बसला आहे.सिन्नर तालुक्यातील गावांमधील ११ योजनांचे नुकसान झाले आहे. नाशिक तालुक्यातील १० गावांमधील योजनांना पावसाचा फटका बसला असून, या सगळ्याच योजनांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी १३ लाख ६९ हजार रुपयांची गरज आहे. असे असतानाच दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्णाला पुन्हा झोडपून काढल्यामुळे त्याचा फटका चांदवड तालुक्यातील दहेगाव-मनमाड पाणीपुरवठा योजनेला बसला आहे.योजनेचा उद्भव असलेल्या विहिरीच्या आजूबाजूचा काँक्रीटचा भराव वाहून गेला आहे. तसेच पंपिंग हाउसच्या बाजूचाही भराव वाहून गेला. तीन इंच व्यासाची शंभर मीटर लांबीची पाइपलाइन वाहून गेली. या योजनेचे एकूण सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या हातपंपाद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. सटाणा तालुक्यातील निताणे येथील योजनेच्या विहिरीचे कंपाउंड पावसाने वाहून गेले आहे.मोसम नदीच्या काठावर ही विहीर असून त्याचेही दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव ताालुक्यातील सौंदाणे पाणीपुरवठा योजनेच्या वितरण व्यवस्थेतील पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. गलाटी नदीचे पाणी गावात शिरल्याने योजनेला फटका बसला असून, दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासंदर्भात नुकसानाची अहवाल शासनाकडे सादर केला असून, दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी ही करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांनीदिली.नदीकाठच्या शेतमालाचे मोठे नुकसानजिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले असले तरी, जुलै अखेरीस त्याने दमदार हजेरी कायम ठेवली. त्यामुळे आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन नद्या, नाल्यांना पूर आले. त्यातही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदीला महापूर येऊन नदीकाठच्या गावांमधील शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पुराचा फटका शेतमालासह जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांनाही बसला.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषण