शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

जळगाव-धुळ्याला पाणीपुरवठा योजना तुडूंब

By admin | Updated: February 21, 2015 01:15 IST

जळगाव-धुळ्याला पाणीपुरवठा योजना तुडूंब

  नाशिक : सन-२०१५-१६ च्या प्रारूप आराखड्यात जळगावसह धुळे जिल्'ातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने निधी मंजूर असूनही पाणीपुरवठा योजनांसाठी एक छदामही नको, म्हटल्याने आदिवासी विकास प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी नेहमीच टंचाई असणाऱ्या या दोन्ही जिल्'ांतील अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करून अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तसेच नंदुरबारचे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी नसल्याने त्यांच्या विभागासाठीचा निधी रोखण्याचे आदेश दिले. नाशिक येथील जिल्हा नियोजन भवनात यासंदर्भात आदिवासी उपयोजनेच्या सन-२०१५-१६ च्या पारूप आराखडा मंजूर करण्यासाठी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्यासह प्रधान सचिव राजगोपाल देवरा तसेच आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी नंदुरबार जिल्'ाचा आदिवासी उपयोजनेचा सन-२०१५-१६चा ४२३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा एकात्मिक प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी सादर केला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे व स्थानिक स्तर विभागाचे अधिकारी हजर नसल्याने त्यांनी मागणी केलेल्या प्रारूप आराखड्यातील दहा कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव रोखण्याचे आदेश प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना दिले. अहमदनगर जिल्'ाचा ७४ कोटी २७ लाखांचा प्रारूप आराखडा सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी अतिरिक्त निधी लागणार असल्याने जास्तीचा निधी देण्याची मागणी केली. जळगाव जिल्'ाचा ६९ कोटी ५२ लाखांचा पारूप आराखडा सादर करण्यात येऊन त्यात निव्वळ आदिवासी भागांसाठी २३ कोटी २० लाखांची तरतूद ठेवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. आरक्षित निधीनुसार जळगाव जिल्'ातील पाणीपुरवठा योजनांसाठी १० कोटींचा निधी मंजूर असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आर. पी. ठाकूर यांनी केंद्र पातळीवरून निधी प्राप्त असल्याने आणि सर्वच गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्याने हा निधी परत करण्यात येणार असल्याचे सांगताच सचिव राजगोपाल देवरा यांनी आश्चर्य व्यक्त करीत धुळे-जळगाव जिल्'ात पाणीटंचाई असताना पाणीपुरवठा योजनांसाठी निधी नको म्हणणे आपल्याला आश्चर्याचे वाटते, असे सांगितले. (प्रतिनिधी)