शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जळगाव-धुळ्याला पाणीपुरवठा योजना तुडूंब

By admin | Updated: February 21, 2015 01:15 IST

जळगाव-धुळ्याला पाणीपुरवठा योजना तुडूंब

  नाशिक : सन-२०१५-१६ च्या प्रारूप आराखड्यात जळगावसह धुळे जिल्'ातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने निधी मंजूर असूनही पाणीपुरवठा योजनांसाठी एक छदामही नको, म्हटल्याने आदिवासी विकास प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी नेहमीच टंचाई असणाऱ्या या दोन्ही जिल्'ांतील अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करून अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तसेच नंदुरबारचे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी नसल्याने त्यांच्या विभागासाठीचा निधी रोखण्याचे आदेश दिले. नाशिक येथील जिल्हा नियोजन भवनात यासंदर्भात आदिवासी उपयोजनेच्या सन-२०१५-१६ च्या पारूप आराखडा मंजूर करण्यासाठी विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्यासह प्रधान सचिव राजगोपाल देवरा तसेच आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी नंदुरबार जिल्'ाचा आदिवासी उपयोजनेचा सन-२०१५-१६चा ४२३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा एकात्मिक प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी सादर केला. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे व स्थानिक स्तर विभागाचे अधिकारी हजर नसल्याने त्यांनी मागणी केलेल्या प्रारूप आराखड्यातील दहा कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव रोखण्याचे आदेश प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना दिले. अहमदनगर जिल्'ाचा ७४ कोटी २७ लाखांचा प्रारूप आराखडा सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी अतिरिक्त निधी लागणार असल्याने जास्तीचा निधी देण्याची मागणी केली. जळगाव जिल्'ाचा ६९ कोटी ५२ लाखांचा पारूप आराखडा सादर करण्यात येऊन त्यात निव्वळ आदिवासी भागांसाठी २३ कोटी २० लाखांची तरतूद ठेवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. आरक्षित निधीनुसार जळगाव जिल्'ातील पाणीपुरवठा योजनांसाठी १० कोटींचा निधी मंजूर असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आर. पी. ठाकूर यांनी केंद्र पातळीवरून निधी प्राप्त असल्याने आणि सर्वच गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्याने हा निधी परत करण्यात येणार असल्याचे सांगताच सचिव राजगोपाल देवरा यांनी आश्चर्य व्यक्त करीत धुळे-जळगाव जिल्'ात पाणीटंचाई असताना पाणीपुरवठा योजनांसाठी निधी नको म्हणणे आपल्याला आश्चर्याचे वाटते, असे सांगितले. (प्रतिनिधी)