शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:15 IST

गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

साकोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या हेतूने ७० लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजना सुरू करून ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतरदेखील तिच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेकवेळा थकीत वीजबिल न भरता लाखो रुपये खर्च करूनही ऐन पावसाळ्यातसुद्धा महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आज दोन वर्षांनंतर सरपंच वैशाली झोडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आज पद रिक्त आहे. ग्रामसेवक ए. बी. सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यातच आता वितरण कंपनीने वीजबिल थकल्यामुळे सदर योजनेचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने विहिरीत पाणी असूनही गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. सरपंच व ग्रामसेवक यांचे बँकेत संयुक्त खाते असून, आज दोघेही नसल्याने वितरण कंपनीला चेक द्यायचा कोणी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जर नवीन सरपंच होण्यासाठी महिना लागला तर गावाला महिन्यानंतर पाणी देणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, सन २००७ पासून तर आजपर्यंतची ही थकबाकी असून, यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यावेळी कोणाची सत्ता होती, त्यांनी वीजबिल का भरले नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत आमची सत्ता आली असून, आम्ही पाच लाख रुपये भरले आहेत. त्यांच्या काळातील थकबाकी आम्ही कशी भरणार, असे उपसरपंच अतुल पाटील यांनी सांगितले; मात्र या संपूर्ण राजकारणात गावकºयांना नाहक पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन ग्रामसेवक सरोदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आपल्या अडचणीचे कारण सांगून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.