शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:15 IST

गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

साकोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या हेतूने ७० लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजना सुरू करून ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतरदेखील तिच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेकवेळा थकीत वीजबिल न भरता लाखो रुपये खर्च करूनही ऐन पावसाळ्यातसुद्धा महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आज दोन वर्षांनंतर सरपंच वैशाली झोडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आज पद रिक्त आहे. ग्रामसेवक ए. बी. सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यातच आता वितरण कंपनीने वीजबिल थकल्यामुळे सदर योजनेचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने विहिरीत पाणी असूनही गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. सरपंच व ग्रामसेवक यांचे बँकेत संयुक्त खाते असून, आज दोघेही नसल्याने वितरण कंपनीला चेक द्यायचा कोणी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जर नवीन सरपंच होण्यासाठी महिना लागला तर गावाला महिन्यानंतर पाणी देणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, सन २००७ पासून तर आजपर्यंतची ही थकबाकी असून, यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यावेळी कोणाची सत्ता होती, त्यांनी वीजबिल का भरले नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत आमची सत्ता आली असून, आम्ही पाच लाख रुपये भरले आहेत. त्यांच्या काळातील थकबाकी आम्ही कशी भरणार, असे उपसरपंच अतुल पाटील यांनी सांगितले; मात्र या संपूर्ण राजकारणात गावकºयांना नाहक पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन ग्रामसेवक सरोदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आपल्या अडचणीचे कारण सांगून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.