शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:15 IST

गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

साकोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या हेतूने ७० लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजना सुरू करून ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतरदेखील तिच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेकवेळा थकीत वीजबिल न भरता लाखो रुपये खर्च करूनही ऐन पावसाळ्यातसुद्धा महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आज दोन वर्षांनंतर सरपंच वैशाली झोडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आज पद रिक्त आहे. ग्रामसेवक ए. बी. सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यातच आता वितरण कंपनीने वीजबिल थकल्यामुळे सदर योजनेचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने विहिरीत पाणी असूनही गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. सरपंच व ग्रामसेवक यांचे बँकेत संयुक्त खाते असून, आज दोघेही नसल्याने वितरण कंपनीला चेक द्यायचा कोणी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जर नवीन सरपंच होण्यासाठी महिना लागला तर गावाला महिन्यानंतर पाणी देणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, सन २००७ पासून तर आजपर्यंतची ही थकबाकी असून, यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यावेळी कोणाची सत्ता होती, त्यांनी वीजबिल का भरले नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत आमची सत्ता आली असून, आम्ही पाच लाख रुपये भरले आहेत. त्यांच्या काळातील थकबाकी आम्ही कशी भरणार, असे उपसरपंच अतुल पाटील यांनी सांगितले; मात्र या संपूर्ण राजकारणात गावकºयांना नाहक पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन ग्रामसेवक सरोदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आपल्या अडचणीचे कारण सांगून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.