शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

साकोरा येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:15 IST

गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

साकोरा : गेल्या १५ दिवसांपूर्वी वीजपंप दोनवेळा जळाला तसेच पाइपलाइन फुटल्याने आता तर वीजपुरवठाच खंडित केल्याने गावाचा ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद झाला असून, सरपंचाचा राजीनामा, ग्रामसेवकाची बदली आदी सर्व कारणांमुळे गावकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतानादेखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा या हेतूने ७० लाख रुपये खर्च करून जलस्वराज्य योजना सुरू करून ती ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतरदेखील तिच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेकवेळा थकीत वीजबिल न भरता लाखो रुपये खर्च करूनही ऐन पावसाळ्यातसुद्धा महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आज दोन वर्षांनंतर सरपंच वैशाली झोडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आज पद रिक्त आहे. ग्रामसेवक ए. बी. सोनवणे यांची बदली झाली आहे. त्यातच आता वितरण कंपनीने वीजबिल थकल्यामुळे सदर योजनेचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने विहिरीत पाणी असूनही गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अजूनही काही निर्णय घेतलेला नाही. सरपंच व ग्रामसेवक यांचे बँकेत संयुक्त खाते असून, आज दोघेही नसल्याने वितरण कंपनीला चेक द्यायचा कोणी, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जर नवीन सरपंच होण्यासाठी महिना लागला तर गावाला महिन्यानंतर पाणी देणार का, असा संतप्त सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, सन २००७ पासून तर आजपर्यंतची ही थकबाकी असून, यावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यावेळी कोणाची सत्ता होती, त्यांनी वीजबिल का भरले नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत आमची सत्ता आली असून, आम्ही पाच लाख रुपये भरले आहेत. त्यांच्या काळातील थकबाकी आम्ही कशी भरणार, असे उपसरपंच अतुल पाटील यांनी सांगितले; मात्र या संपूर्ण राजकारणात गावकºयांना नाहक पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत नवीन ग्रामसेवक सरोदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आपल्या अडचणीचे कारण सांगून दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.