शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST

राजेंद्र मंडळ पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा ...

राजेंद्र मंडळ

पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा सामना करताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत असून, त्या विहिरीतूनही सर्वांना पाणी मिळत नसल्याने, वृद्ध आणि महिला वर्गाला पाण्यावाचून हाल सहन करावे लागत आहे. संबंधितांनी त्वरित गावाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पाडळदे परिसरात जलप्राधिकरणामार्फत सव्वीस गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरविले जाते. जवळजवळ वीस दिवसांपासून पाडळदे गावासह परिसराला पाणीपुरवठा झालेला नसल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे कडक उन्हाळा अशा दुहेरी संकटात सापडल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. माळमाथा परिसर असल्यामुळे येथील नागरिकांना शेतीवर अवलंबून राहावे लागते. उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसून लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकत ही नाही, त्यामुळे मतदार ग्रामस्थांत नाराजी आहे. राज्याच्या कृषिमंत्री दादा भुसे यांचेही गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नेहमीच या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असते. त्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. या भागाकडे कोणी लक्ष देत नाही. परिसरातील सर्व नागरिक प्रामाणिकपणे हजारो रुपये पाणीपट्टी दरवर्षाला भरत असूनही वेळेवर पाणी सोडले जात नाही. शहरातील नागरिकांना जास्त सुविधा दिल्या जातात. त्या ग्रामीण भागात मिळत नाही. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याजोगे योग्य पाणी फक्त वेळेवर मिळावे, एवढीच अपेक्षा आहे, परंतु येत्या गेल्या वीस दिवसांपासून पाणी न आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ग्रामस्थांची लहान मुलांना अनवाणी घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. परिसरातील नागरिक आम्ही माणसं नाहीत का, शहरातीलच नागरिकच माणसं आहेत का, असा सवाल करीत आहेत. शहरात सर्वच नागरी सुविधा पुरविल्या जातात आणि ग्रामीण भागातील लोकांना पुरवत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. एवढ्या एक-दोन दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ रास्ता रोको व उपोषण करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

पिण्यासाठी शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा करूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच शौचाला उघड्यावर जावे लागत असल्याने साथीचे आजार अधिक पसरण्याची भीती बाळगली जात असून, लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष द्यावे. संबंधितांनी त्वरित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अशी मागणी भिका मंडळ, धीरज मंडळ, नाना पगार, प्रवीण जिंजर, सतीश कुलकर्णी, विठ्ठल सैंदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे सागर फंगाळ, योगेश मंडळ, तुळशीराम ठाकरे यांनी केली आहे.

फोटो - २३ मालेगाव १

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.

Attachments area

===Photopath===

230521\23nsk_1_23052021_13.jpg

===Caption===

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.