शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST

राजेंद्र मंडळ पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा ...

राजेंद्र मंडळ

पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा सामना करताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत असून, त्या विहिरीतूनही सर्वांना पाणी मिळत नसल्याने, वृद्ध आणि महिला वर्गाला पाण्यावाचून हाल सहन करावे लागत आहे. संबंधितांनी त्वरित गावाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पाडळदे परिसरात जलप्राधिकरणामार्फत सव्वीस गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरविले जाते. जवळजवळ वीस दिवसांपासून पाडळदे गावासह परिसराला पाणीपुरवठा झालेला नसल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे कडक उन्हाळा अशा दुहेरी संकटात सापडल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. माळमाथा परिसर असल्यामुळे येथील नागरिकांना शेतीवर अवलंबून राहावे लागते. उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसून लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकत ही नाही, त्यामुळे मतदार ग्रामस्थांत नाराजी आहे. राज्याच्या कृषिमंत्री दादा भुसे यांचेही गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नेहमीच या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असते. त्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. या भागाकडे कोणी लक्ष देत नाही. परिसरातील सर्व नागरिक प्रामाणिकपणे हजारो रुपये पाणीपट्टी दरवर्षाला भरत असूनही वेळेवर पाणी सोडले जात नाही. शहरातील नागरिकांना जास्त सुविधा दिल्या जातात. त्या ग्रामीण भागात मिळत नाही. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याजोगे योग्य पाणी फक्त वेळेवर मिळावे, एवढीच अपेक्षा आहे, परंतु येत्या गेल्या वीस दिवसांपासून पाणी न आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ग्रामस्थांची लहान मुलांना अनवाणी घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. परिसरातील नागरिक आम्ही माणसं नाहीत का, शहरातीलच नागरिकच माणसं आहेत का, असा सवाल करीत आहेत. शहरात सर्वच नागरी सुविधा पुरविल्या जातात आणि ग्रामीण भागातील लोकांना पुरवत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. एवढ्या एक-दोन दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ रास्ता रोको व उपोषण करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

पिण्यासाठी शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा करूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच शौचाला उघड्यावर जावे लागत असल्याने साथीचे आजार अधिक पसरण्याची भीती बाळगली जात असून, लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष द्यावे. संबंधितांनी त्वरित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अशी मागणी भिका मंडळ, धीरज मंडळ, नाना पगार, प्रवीण जिंजर, सतीश कुलकर्णी, विठ्ठल सैंदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे सागर फंगाळ, योगेश मंडळ, तुळशीराम ठाकरे यांनी केली आहे.

फोटो - २३ मालेगाव १

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.

Attachments area

===Photopath===

230521\23nsk_1_23052021_13.jpg

===Caption===

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.