शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST

राजेंद्र मंडळ पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा ...

राजेंद्र मंडळ

पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा सामना करताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत असून, त्या विहिरीतूनही सर्वांना पाणी मिळत नसल्याने, वृद्ध आणि महिला वर्गाला पाण्यावाचून हाल सहन करावे लागत आहे. संबंधितांनी त्वरित गावाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पाडळदे परिसरात जलप्राधिकरणामार्फत सव्वीस गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरविले जाते. जवळजवळ वीस दिवसांपासून पाडळदे गावासह परिसराला पाणीपुरवठा झालेला नसल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे कडक उन्हाळा अशा दुहेरी संकटात सापडल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. माळमाथा परिसर असल्यामुळे येथील नागरिकांना शेतीवर अवलंबून राहावे लागते. उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसून लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकत ही नाही, त्यामुळे मतदार ग्रामस्थांत नाराजी आहे. राज्याच्या कृषिमंत्री दादा भुसे यांचेही गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नेहमीच या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असते. त्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. या भागाकडे कोणी लक्ष देत नाही. परिसरातील सर्व नागरिक प्रामाणिकपणे हजारो रुपये पाणीपट्टी दरवर्षाला भरत असूनही वेळेवर पाणी सोडले जात नाही. शहरातील नागरिकांना जास्त सुविधा दिल्या जातात. त्या ग्रामीण भागात मिळत नाही. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याजोगे योग्य पाणी फक्त वेळेवर मिळावे, एवढीच अपेक्षा आहे, परंतु येत्या गेल्या वीस दिवसांपासून पाणी न आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ग्रामस्थांची लहान मुलांना अनवाणी घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. परिसरातील नागरिक आम्ही माणसं नाहीत का, शहरातीलच नागरिकच माणसं आहेत का, असा सवाल करीत आहेत. शहरात सर्वच नागरी सुविधा पुरविल्या जातात आणि ग्रामीण भागातील लोकांना पुरवत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. एवढ्या एक-दोन दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ रास्ता रोको व उपोषण करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

पिण्यासाठी शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा करूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच शौचाला उघड्यावर जावे लागत असल्याने साथीचे आजार अधिक पसरण्याची भीती बाळगली जात असून, लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष द्यावे. संबंधितांनी त्वरित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अशी मागणी भिका मंडळ, धीरज मंडळ, नाना पगार, प्रवीण जिंजर, सतीश कुलकर्णी, विठ्ठल सैंदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे सागर फंगाळ, योगेश मंडळ, तुळशीराम ठाकरे यांनी केली आहे.

फोटो - २३ मालेगाव १

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.

Attachments area

===Photopath===

230521\23nsk_1_23052021_13.jpg

===Caption===

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.