शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाडळदेला वीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST

राजेंद्र मंडळ पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा ...

राजेंद्र मंडळ

पाडळदे : येथे गेल्या वीस दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून एकीकडे कोरोनाचा सामना करताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टँकरने पाणी आणून विहिरीत टाकावे लागत असून, त्या विहिरीतूनही सर्वांना पाणी मिळत नसल्याने, वृद्ध आणि महिला वर्गाला पाण्यावाचून हाल सहन करावे लागत आहे. संबंधितांनी त्वरित गावाचा पाणीप्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पाडळदे परिसरात जलप्राधिकरणामार्फत सव्वीस गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरविले जाते. जवळजवळ वीस दिवसांपासून पाडळदे गावासह परिसराला पाणीपुरवठा झालेला नसल्याने येथील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तर दुसरीकडे कडक उन्हाळा अशा दुहेरी संकटात सापडल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. माळमाथा परिसर असल्यामुळे येथील नागरिकांना शेतीवर अवलंबून राहावे लागते. उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नसून लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकत ही नाही, त्यामुळे मतदार ग्रामस्थांत नाराजी आहे. राज्याच्या कृषिमंत्री दादा भुसे यांचेही गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नेहमीच या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत असते. त्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. या भागाकडे कोणी लक्ष देत नाही. परिसरातील सर्व नागरिक प्रामाणिकपणे हजारो रुपये पाणीपट्टी दरवर्षाला भरत असूनही वेळेवर पाणी सोडले जात नाही. शहरातील नागरिकांना जास्त सुविधा दिल्या जातात. त्या ग्रामीण भागात मिळत नाही. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याजोगे योग्य पाणी फक्त वेळेवर मिळावे, एवढीच अपेक्षा आहे, परंतु येत्या गेल्या वीस दिवसांपासून पाणी न आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ग्रामस्थांची लहान मुलांना अनवाणी घेऊन पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. परिसरातील नागरिक आम्ही माणसं नाहीत का, शहरातीलच नागरिकच माणसं आहेत का, असा सवाल करीत आहेत. शहरात सर्वच नागरी सुविधा पुरविल्या जातात आणि ग्रामीण भागातील लोकांना पुरवत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. एवढ्या एक-दोन दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ रास्ता रोको व उपोषण करण्याच्या मन:स्थितीत आहेत.

पिण्यासाठी शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकरने पाणीपुरवठा करूनही लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही, तसेच शौचाला उघड्यावर जावे लागत असल्याने साथीचे आजार अधिक पसरण्याची भीती बाळगली जात असून, लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी या भागाकडे लक्ष द्यावे. संबंधितांनी त्वरित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अशी मागणी भिका मंडळ, धीरज मंडळ, नाना पगार, प्रवीण जिंजर, सतीश कुलकर्णी, विठ्ठल सैंदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे सागर फंगाळ, योगेश मंडळ, तुळशीराम ठाकरे यांनी केली आहे.

फोटो - २३ मालेगाव १

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.

Attachments area

===Photopath===

230521\23nsk_1_23052021_13.jpg

===Caption===

पाडळदे येथे विहिरीत टँकरने आणून टाकलेले पाणी घेण्यासाठी उडालेली झुंबड.