शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: October 19, 2015 21:51 IST

शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत

इंदिरानगर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने पाणीकपात केली आहे. मात्र नियोजित वेळेत पुरेसे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार होत आहे. इंदिरानगरसह शहरातील अनेक भागात अशाप्रकारचा अनुभव नागरिकांना येत आहे. महापालिकेने शहरात पाणीकपात लागू केल्यानंतर इंदिरानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात उपवास असतानाही महिला वर्गास पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरातील शास्त्रीनगर, मोदकेश्वर कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, देवेंद्र सोसायटी, पाटील गार्डन, सिद्धी विनायक सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी कमी येत असल्याने परिसरातील जलकुंभ भरला जात नाही परिणाम अपुरा पाणीपुरवठा होतो. नवीन पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार परिसरात एकच वेळ पाणीपुरवठा होत होत असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात पाणी दिवसाआडच येते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात पाणीपुरवठ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.