शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव येथे दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:57 IST

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्विरत देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देमहिलांची भटकंती : गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन देण्याची मागणी

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्विरत देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.देवगावला सन १९८१ पासुन ग्रामपंचायत अहल्यादेवी कालीन बारवातून नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. परंतु ज्या विहीरीतुन पाणीपुरवठा केला जातो. त्या विहिरीचे पाणी पावसाळा संपताच गावा जवळुन जाणार्या गोदावरी डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असते.कालव्याला पाणी नसेल तर पाणीपुरवठा योजना कोलमडते. दरवर्षी होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने दोन विहिरी, गल्ली बोळात, खळयात- मळ्यात हातपंपही दिले आहेत. यापैकी दोनच हातपंप चालू आहेत, व तेही पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात गोदावरी डाव्या कालव्यात पाणी असेल तर, आणि कालवा ओसरला की एक हंडाभर पाण्यासाठी महिलांची दमछाक होते.पूर्वी गोदावरी डाव्या कालव्याचे दरमहा १५ ते २० दिवसांचे आवर्तन असायचे मागील काही वर्षांपासून कमी पडणारा पावसाळा आणि धरणातून मराठवाडा व जायकवाडी धरणाला जाणारे पाणी यामुळे आवर्तनाला उशीर होतो. आवर्तन सोडायचे की नाही हे वरून ठरत असल्यामुळे पाणी कालव्यात कधी येणार याचा कालवा अधिकार्यांनाही तपास नसतो. त्यामुळे गावाला पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु कालव्यात पाणी असले तर पाण्याची रेलचेल असते. ही पाण्याची विपुलता पाहून पाणीटंचाई ग्रस्त गावे देवगावचा हेवा करतात.गावाला लागून असणारा दुथडी वाहणारा गोदावरी कालवा व नांदूर मधमेश्वर जलद कालवा, रानोमाळ विहिरींना भरपूर पाणी, पाण्यामुळे शेतात डोलणारी हिरवीगार पिके हे पाहून इतरांना हेवा वाटणे सहाजिकच आहे. परंतु पाण्याच्या विपुलतेचा आनंद पावसाळ्यात साधारण निम्मा हिवाळा आणि उन्हाळ्यात कालव्याला पाणी असेल तर उपभोगता येतो.या वर्षी गावाला हिवाळ्याच्या मध्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. आज गावाला दिवसाड पाणी पुरवठा होत आहे. आवर्तनाला उशीर झाला तर मात्र गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल आणि महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागेल.