शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

देवगाव येथे दिवसाआड पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:57 IST

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्विरत देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देमहिलांची भटकंती : गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन देण्याची मागणी

देवगाव : गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि गावातील हातपंपाच्या पाण्याने तळ गाठल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामपंचायतीने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दिवसाआड केला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तेव्हा गोदावरी डावा कालव्याचे आवर्तन त्विरत देऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.देवगावला सन १९८१ पासुन ग्रामपंचायत अहल्यादेवी कालीन बारवातून नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. परंतु ज्या विहीरीतुन पाणीपुरवठा केला जातो. त्या विहिरीचे पाणी पावसाळा संपताच गावा जवळुन जाणार्या गोदावरी डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असते.कालव्याला पाणी नसेल तर पाणीपुरवठा योजना कोलमडते. दरवर्षी होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने दोन विहिरी, गल्ली बोळात, खळयात- मळ्यात हातपंपही दिले आहेत. यापैकी दोनच हातपंप चालू आहेत, व तेही पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात गोदावरी डाव्या कालव्यात पाणी असेल तर, आणि कालवा ओसरला की एक हंडाभर पाण्यासाठी महिलांची दमछाक होते.पूर्वी गोदावरी डाव्या कालव्याचे दरमहा १५ ते २० दिवसांचे आवर्तन असायचे मागील काही वर्षांपासून कमी पडणारा पावसाळा आणि धरणातून मराठवाडा व जायकवाडी धरणाला जाणारे पाणी यामुळे आवर्तनाला उशीर होतो. आवर्तन सोडायचे की नाही हे वरून ठरत असल्यामुळे पाणी कालव्यात कधी येणार याचा कालवा अधिकार्यांनाही तपास नसतो. त्यामुळे गावाला पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु कालव्यात पाणी असले तर पाण्याची रेलचेल असते. ही पाण्याची विपुलता पाहून पाणीटंचाई ग्रस्त गावे देवगावचा हेवा करतात.गावाला लागून असणारा दुथडी वाहणारा गोदावरी कालवा व नांदूर मधमेश्वर जलद कालवा, रानोमाळ विहिरींना भरपूर पाणी, पाण्यामुळे शेतात डोलणारी हिरवीगार पिके हे पाहून इतरांना हेवा वाटणे सहाजिकच आहे. परंतु पाण्याच्या विपुलतेचा आनंद पावसाळ्यात साधारण निम्मा हिवाळा आणि उन्हाळ्यात कालव्याला पाणी असेल तर उपभोगता येतो.या वर्षी गावाला हिवाळ्याच्या मध्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. आज गावाला दिवसाड पाणी पुरवठा होत आहे. आवर्तनाला उशीर झाला तर मात्र गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल आणि महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागेल.