शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चांदगावकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST

येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : सामाजिक बहुद्देशीय संस्थेने दिला आधारमहिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही.

येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.गावातील नागरिक व महिलांची पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती होत आहे, या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अझहर शाह यांनी चांदगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावेळी बबनराव साळवे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते पाणीवाटप करण्यात आले. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला; मात्र येवला तालुका कोरडाच राहिल्याने आता उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसून येत आहे.या प्रश्नाची जाण राखून सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे. या सामाजिक कार्याबद्दल चांदगाव ग्रामस्थांनी या उपक्र माचे स्वागत केले आहे.महिनाभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव पडूनयेवला तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनीदेखील परिसराची पाहणी केली; मात्र यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर होतो.महिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही. त्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.