शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

चांदगावकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST

येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : सामाजिक बहुद्देशीय संस्थेने दिला आधारमहिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही.

येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.गावातील नागरिक व महिलांची पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती होत आहे, या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अझहर शाह यांनी चांदगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावेळी बबनराव साळवे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते पाणीवाटप करण्यात आले. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला; मात्र येवला तालुका कोरडाच राहिल्याने आता उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसून येत आहे.या प्रश्नाची जाण राखून सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे. या सामाजिक कार्याबद्दल चांदगाव ग्रामस्थांनी या उपक्र माचे स्वागत केले आहे.महिनाभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव पडूनयेवला तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनीदेखील परिसराची पाहणी केली; मात्र यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर होतो.महिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही. त्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.