शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांदगावकरांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:03 IST

येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : सामाजिक बहुद्देशीय संस्थेने दिला आधारमहिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही.

येवला : तालुक्यातील चांदगाव परिसरात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या आगमनापूर्वीच नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती करावी लागत आहे. ही वणवण थांबविण्यासाठी सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊन गावकºयांची वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.गावातील नागरिक व महिलांची पाण्यासाठी आत्तापासूनच भटकंती होत आहे, या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सामाजिक विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अझहर शाह यांनी चांदगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावेळी बबनराव साळवे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते पाणीवाटप करण्यात आले. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला; मात्र येवला तालुका कोरडाच राहिल्याने आता उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसून येत आहे.या प्रश्नाची जाण राखून सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहºयावर समाधान दिसून येत आहे. या सामाजिक कार्याबद्दल चांदगाव ग्रामस्थांनी या उपक्र माचे स्वागत केले आहे.महिनाभरापूर्वी पाठविलेला प्रस्ताव पडूनयेवला तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनीदेखील परिसराची पाहणी केली; मात्र यासंदर्भात प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर होतो.महिनाभरापूर्वी प्रस्ताव पाठवूनदेखील प्रस्ताव यंदा मंजूर झाला नाही. त्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.