नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमार्फत जिल्ह्णातील पाणीटंचाई असलेल्या १५ गावे आणि ७१ वाड्या मिळून ८६ गाववाड्यांना १८ शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टंचाई कृती आराखड्यास मंजुरी मिळाली असून, नुकताच त्यासाठी पाच कोटी ९१ लाखांचा निधीही विभागाला प्राप्त झाला आहे.जिल्ह्णातील टॅँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गाव वाड्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे कंसात टॅँकरची संख्या - बागलाण - ६ गावे - १ वाडी - (५), चांदवड - ०, दिंडोरी - ०, देवळा - ०, इगतपुरी - ०, कळवण - ०, मालेगाव - १ गाव (१), नांदगाव - ३ गावे - ३९ वाड्या (५), नाशिक - ०, निफाड - ०, पेठ - ०, सुरगाणा - ०, सिन्नर - ५ गावे, ३१ वाड्या(७), त्र्यंबकेश्वर - ०, येवला - ० असे एकूण १५ गावे, ७१ वाड्या मिळून ८६ गाववाड्यांना १८ शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच बागलाण तालुक्यात ६, मालेगाव - १, नांदगाव - १ अशा एकूण आठ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरसाठी दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाई कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पाच कोटी ९१ लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिवाळा असूनही जिल्ह्यात ८६ गाव-वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने उन्हाळ्यात यापेक्षा गंभीर परिस्थिती होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
८६ गाववाड्यांना १८ टॅँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: December 7, 2015 22:58 IST