शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

नार-पारचे पाणी गुजरातला

By admin | Updated: December 8, 2015 23:13 IST

जलचिंतनचा आरोप : केंद्राचा अहवाल महाराष्ट्राच्या संमतीसाठी सादर

नाशिक : राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने (एनडब्ल्यूडीए) पार-तापी- नर्मदा लिंकचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो २५ आॅगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्र सरकारला संमतीसाठी सादर केला आहे. हा अहवाल आता नाशिक येथे सीडीओ मेरीकडे तपासणीसाठी आला आहे. त्यात नार-पार खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी गुजरातकडे कच्छ-सौराष्ट्रला देण्याचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या हक्काच्या २९ टीएमसी पाण्यापैकी केवळ ८ टीएमसी पाणीच महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास हा राज्यावर अन्याय होणार असून, गिरणा खोऱ्यास पाणी मिळणार नाही. तसेच यापुढे राज्यातील कोणत्याही प्रकल्पांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळणार नसल्याची भीतीही राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे. जाधव यांनी सांगितले की, जायकवाडीच्या पाण्यावरून आजच नाशिक- अहमदनगर-मराठवाड्याचा प्रादेशिक वाद चालू आहे. गिरणा धरणाच्या पाण्यावरून कसमा व जळगाव या जिल्ह्णांत वाद चालू आहेत. त्यासाठी दमणगंगा नार-पारचे पाणी आणणे आवश्यक आहे. असे असताना महाराष्ट्राच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी केंद्राच्या दबावामुळे राज्य सरकार गुजरातला देण्याचा घाट घालत आहे. खरे तर गुजरात राज्याची ४५ टक्के सिंचन झाले आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात अवघे १८ टक्के सिंचन झाले आहे. नाशिक जिल्ह्णातील जवळपास १५०० गावे आज दुष्काळात होरपळत आहेत. अशा परिस्थितीत जर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळाले तर सिंचन क्षमता गुजरातच्या बरोबरीने होण्याची शक्यता आहे. पण केंद्रातील गुजरात धार्जिने मोदी सरकार राज्य सरकारवर अहवालाच्या संमतीसाठी दबाव आणत आहे. या पाण्यावरचा महाराष्ट्राचा हक्क गेल्यास गिरणा-गोदावरीचे भवितव्य अंधारात येण्याची शक्यता राजेंद्र जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)