शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणच्या पश्चिम पट्टयातील गावांना पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:01 IST

कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्टयातील गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ महिलांवर आली असून पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागत आहे.

कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्टयातील गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ महिलांवर आली असून पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागत आहे. आरम नदीचे पात्र कोरडे ठाक पडल्याने सात ते आठ गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने येथील ग्रामस्थांना दोन दिवसाआड अल्प पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. केळझर धरणातून आरम नदीला तात्काळ पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी बागलाण तालूका राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बागलाणच्या पश्चिम पट्टयातील डांगसौदाणे, कंधाणे, निकवेल, जूनेनिरपुर, नवेनिरपुर, खमताणे, मुंजवाड, आदि गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यातील बहुतांशी गावांच्या सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना आरम नदीच्या पाण्यावर विसंबुन असुन नदीला पाणी तर गावाला पाणी असे समीकरणच बनले आहे. सध्या आरम नदीचे पात्र कोरडेठाक पडले असून यामुळे या गावांची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विहीरीतच पाणी नसल्याने गाव प्रशासनापुढे पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. दररोज प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनांबरोबरच शेतीसिंचनाचाही पाणीप्रश्न गंभीर बनल्याने पाळीव प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे केळझर धरणातून आरमनदीत पाण्याचे आवर्तन सोडून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्याची मागणी बागलाण तालूका राष्ट्रवादी युवक कांग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे. वाढत्या तपमानामुळे धरणातील जलसाठ्यांचे बाष्पीभवन होत असल्याने प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, दोन दिवसात आवर्तन न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक