शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:36 IST

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे श्रावणसरींची प्रतीक्षा : पाण्याअभावी शेतकरी चिंतित

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.कमी पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा उळे टाकून रोपे तयार करून ठेवली आहेत; मात्र लागवडीसाठी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. याआधीच खरिपातील अन्य पिके पावसाअभावी सुकली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. हा आर्थिक फटका सहन करत असतानाच येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाºया कांदा पिकाचे भवितव्य श्रावण महिन्याच्या सरींवर अवलंबून आहे. परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी कांदा लागवड सुरू केली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीस सुरु वात होईल, अशी आशा आहे.पिके सुकेल्याने व फुलोºयात झटका बसून अपेक्षित उत्पादन न होता घट येणार आहे. या परिसरात दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला लवकरच कांदा लागवड करतात. यावेळी पाऊस पाणीच नसल्याने लागवड उशिरा होणार आहे. मात्र त्याकरिता पुढे होणाºया पावसावर गणित अवलंबून राहणार आहेच. परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने विहिरींना पाणी नाही. नदी, नाले, बंधारे, शेततळे, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. काही शेतकºयांना आपल्याकडे साठवणूक केलेल्या पाण्यावर तर काहींनी निसर्गभरोसे रोपे जगविली आहेत. पंचेचाळीस दिवसांपूर्वी टाकलेली रोपे लागवड योग्य तयार झाली आहे. काहींना थोडेसुद्धा पाणी नसल्याने ती जळाली. आज न उद्या पाऊस येईल या आशेने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी शेत मशागत करून पाळे पाडून वाफे तयार करून ठेवली आहेत. श्रावणात रिमझिम पाहळे स्वरूपात जरी पाऊस पडत राहिला तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड कोरडवाहू स्वरुपात होईल आणि त्यानंतर शेतकºयांचे डोळे परतीच्या पावसावर राहतील.