शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:36 IST

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे श्रावणसरींची प्रतीक्षा : पाण्याअभावी शेतकरी चिंतित

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने भर पावसाळ्यात परिपरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.कमी पाण्यावर शेतकऱ्यांनी कांदा उळे टाकून रोपे तयार करून ठेवली आहेत; मात्र लागवडीसाठी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतित आहे. याआधीच खरिपातील अन्य पिके पावसाअभावी सुकली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. हा आर्थिक फटका सहन करत असतानाच येथील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाºया कांदा पिकाचे भवितव्य श्रावण महिन्याच्या सरींवर अवलंबून आहे. परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या भरवशावर काही शेतकºयांनी कांदा लागवड सुरू केली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीस सुरु वात होईल, अशी आशा आहे.पिके सुकेल्याने व फुलोºयात झटका बसून अपेक्षित उत्पादन न होता घट येणार आहे. या परिसरात दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला लवकरच कांदा लागवड करतात. यावेळी पाऊस पाणीच नसल्याने लागवड उशिरा होणार आहे. मात्र त्याकरिता पुढे होणाºया पावसावर गणित अवलंबून राहणार आहेच. परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने विहिरींना पाणी नाही. नदी, नाले, बंधारे, शेततळे, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. काही शेतकºयांना आपल्याकडे साठवणूक केलेल्या पाण्यावर तर काहींनी निसर्गभरोसे रोपे जगविली आहेत. पंचेचाळीस दिवसांपूर्वी टाकलेली रोपे लागवड योग्य तयार झाली आहे. काहींना थोडेसुद्धा पाणी नसल्याने ती जळाली. आज न उद्या पाऊस येईल या आशेने शेतकºयांनी कांदा लागवडीसाठी शेत मशागत करून पाळे पाडून वाफे तयार करून ठेवली आहेत. श्रावणात रिमझिम पाहळे स्वरूपात जरी पाऊस पडत राहिला तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड कोरडवाहू स्वरुपात होईल आणि त्यानंतर शेतकºयांचे डोळे परतीच्या पावसावर राहतील.