शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

देवळ्यासह नऊ गावात पाणीटंचाई

By admin | Updated: February 25, 2016 23:19 IST

पाण्यासाठी भटकंती : गिरणा नदीपात्र कोरडे; उपाययोजना करण्याची मागणी

 देवळा : सामुदायिक पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर गिरणा नदीवर अवलंबून असून, गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे देवळ्यासह नऊ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.लोहोणेर येथील नऊ गाव पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर व येथील नगरपंचायतीची जलशुद्धीकरण योजनेची विहीर यातील साठा पाहता देवळा शहरासह नऊ गावांना पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. त्यावर उपाययोजना म्हणून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मात्र त्यांच्याही विहिरींनी तळ गाठला असल्याने शहराला डोण शिवारातील कालवण धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पिण्यासाठी ७ एमसीएफटी पाणी आरक्षित करून घेतले. योगायोगाने पुनंद व चणकापूरमधून रामेश्वरबरोबरच डोण शिवारातील कालवण धरणात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरासह नऊ गावांचा पाणीप्रश्न गिरणा नदीचे पुढील आवर्तन येईपर्यंत तरी सुटणार आहे. मात्र त्यासाठी लागणारा वीजपुरवठा आठवड्यातून तीन दिवस आठ तासच मिळणार आहे. मात्र सदरच्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसे झाले तरच पाणीप्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनी यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, प्रदीप अहेर, जितेंद्र अहेर, अतुल पवार, बाळासाहेब अहेर, किरण अहेर, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नंदन नवरे, उपअभियंता बोरसे, चव्हाण, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता घुमरे, तांत्रिक सल्लागार देवरे, कुरणे, कुंदन चव्हाण, संजय बांगर सहभागी झाले होते. (वार्ताहर)