शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

देवळ्यासह नऊ गावात पाणीटंचाई

By admin | Updated: February 25, 2016 23:19 IST

पाण्यासाठी भटकंती : गिरणा नदीपात्र कोरडे; उपाययोजना करण्याची मागणी

 देवळा : सामुदायिक पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर गिरणा नदीवर अवलंबून असून, गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे देवळ्यासह नऊ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.लोहोणेर येथील नऊ गाव पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर व येथील नगरपंचायतीची जलशुद्धीकरण योजनेची विहीर यातील साठा पाहता देवळा शहरासह नऊ गावांना पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. त्यावर उपाययोजना म्हणून आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी अधिग्रहित करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मात्र त्यांच्याही विहिरींनी तळ गाठला असल्याने शहराला डोण शिवारातील कालवण धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पिण्यासाठी ७ एमसीएफटी पाणी आरक्षित करून घेतले. योगायोगाने पुनंद व चणकापूरमधून रामेश्वरबरोबरच डोण शिवारातील कालवण धरणात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरासह नऊ गावांचा पाणीप्रश्न गिरणा नदीचे पुढील आवर्तन येईपर्यंत तरी सुटणार आहे. मात्र त्यासाठी लागणारा वीजपुरवठा आठवड्यातून तीन दिवस आठ तासच मिळणार आहे. मात्र सदरच्या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसे झाले तरच पाणीप्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पुरवठा विभाग व वीज वितरण कंपनी यांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, नगरसेवक लक्ष्मीकांत अहेर, प्रदीप अहेर, जितेंद्र अहेर, अतुल पवार, बाळासाहेब अहेर, किरण अहेर, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नंदन नवरे, उपअभियंता बोरसे, चव्हाण, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता घुमरे, तांत्रिक सल्लागार देवरे, कुरणे, कुंदन चव्हाण, संजय बांगर सहभागी झाले होते. (वार्ताहर)