शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नामपूर येथे पाणीटंचाई

By admin | Updated: February 15, 2016 23:58 IST

नामपूर येथे पाणीटंचाई

 नामपूर : पंचक्रोशीत पाणीच नसल्याने गावात जिकडे तिकडे पाण्यावरच चर्चा ऐकायला मिळत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. आताच पाणीटंचाईने इतके उग्र स्वरूप धारण केले असून, उन्हाळ्यात पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.नामपूरमध्ये पाणीटंचाईने कळस गाठला आहे. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत आता एखाद्या नगरालाही पुरेल इतकेही पाणी नाही. या दृष्टीने गावाला आता टँकरद्वारे पाणीपुरवठा हा एकमेव उपाय आहे. मध्यंतरी बागलाणच्या आमदारांनी नामपूरला पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती; मात्र अद्याप कार्यवाही नाही. सरपंच प्रमोद सावंत, अशोक सावंत व इतर ग्रामपंचायत सदस्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. गावाला दररोज किमान १० टँकर पाणी मिळाल्यास पाणीप्रश्न काही प्रमाणावर सुटण्यास मदत होऊ शकते. नामपूरमध्ये १९७५साली असलेल्या ७५०० इतक्या लोकसंख्येला गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले होते. त्याकाळी इंदिरानगर या नामपूरला जोडून असलेल्या वस्तीत केवळ २०-२५ घरे होती. आज तिथे एकूण १४ नगरे आहेत. नामपूर गावही विस्तारले आहे; मात्र आजही नामपूरला १९७५ सालची कालबाह्य योजना पाणीपुरवठा करते आहे. ठोस व कायमस्वरूपी योजना राबविणे काळाची गरज आहे, अशी मागणी शिवराय ग्रुपचे स्नेहराज सावंत, अमोल पाटील, विकिराज सावंत यांनी केले आहे. रंजना मुथा या वॉर्डात दररोज दोन टँकर पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून देत आहेत. तर जैन समाजाचे रमेश मुथा, सरपंच प्रमोद सावंत यांनी आपल्या विहिरीचे पाणी नामपूर गावास दिले आहे; मात्र हे असे किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)