शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

१९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा : बारा गावांसह वाड्यावस्त्यांवरील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

 ंयेवला : पाण्यासाठी भटकंती करण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात टँकरग्रस्त गावांची संख्या वाढतच असून, ३७ गावे आणि ३२ वाड्यांना १९ टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.येवला तालुक्यात केवळ ४३३ मि.मी. पाऊस झाला. अल्पपर्जन्य-मानामुळे गेल्या जानेवारीतच ग्रामीण भागातील सर्व जलाशये कोरडेठाक झाले असून, सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. येवला शहरालगत असलेले ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात फेब्रुवारीअखेर केवळ चार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. हा साठवण तलावदेखील तळ गाठण्याच्या स्थितीत आहे. सध्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून ४५ गावांची तहान भागवली जात आहे. ७९.२० दक्षलक्ष घनफूट पाणी आरक्षण या योजनेसाठी असले तरी जानेवारीमध्ये मागणीप्रमाणे पालखेड विभागाने साठवण तलाव भरून दिला नाही. त्यामुळे हा पाणीसाठा मार्चअखेर पुरवण्याचे आव्हान आहे.तालुक्यात ३८ गाव नळपुरवठा योजनेमुळे ज्या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे त्या गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. या नळ योजनेच्या अंमलबजावणीतही सद्यस्थितीत कुठल्याही त्रुटी दिसत नाही. सद्यस्थितीत तालुक्यातील ३७ गावे व ३२ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कुसुमाडी, वाईबोथी, सायगाव, बाळापूर, पांजरवाडी, बोकटे, दुगलगाव, अहेरवाडी, लहित, जायदरे, मुरमी, आडगाव रेपाळ, धामणगाव, खिर्डीसाठे, देवळाणे, खरवंडी, देवदरी, कोटमगाव खु।।, तांदूळवाडी, खैरगव्हाण, महालगाव, हडप सावरगाव, चिचोंडी बु।।, बल्हेगाव, रायते या २६ गावांसह महादेववाडी, चांदरजठार वस्ती, रानमळा, सायगाव फाटा, गोपाळवाडी, हनुमाननगर, गोल्हेवाडी रोड वस्ती, घनामाळी मळा, वडाचा मळा, कुडके सानप वस्ती, माळवाडी, गाडेकर वस्ती, हनुमाननगर (खिर्डीसाठे), राजापूरमधील वाघ वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथ वस्ती, सानप वस्ती, महानुभाव वस्ती, अंदरसूलमधील योगेश्वरवाडी, शंकरवाडी, फुलेवाडी, सावतावाडी, जयहिंदवाडी, दळे वस्ती, रामवाडी, बजरंगवाडी, देशमुखवाडी, या वस्त्यांवर १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.दरम्यान, धनकवाडी, कासारखेडे, गोपाळवाडी, वडगाव, ममदापूर, मातुलठाण, कातोरे वस्ती, कोटमगाव बु।।, बदापूर, चिचोंडी खु।।, सातारे ही ११ गावे व ममदापूर परिसरातील १३ वाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले असून, या गावांना जादा चार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली.गाव पाहणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेले प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत काही गावे आहेत़ रेंडाळे, न्याहारखेडे, पिंपळखुटे, तिसरे, पिंपळखुटे बु।।, नागडे, भारम, रहाडी, वाघाळे, मानोरी बु।।, खडकीमाळ, आडसुरेगाव या अकरा गावांसह भारम परिसरातील जेजूरकर वस्ती, आड सुरेगाव वस्ती, बोकटे वस्ती या तीन वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार शरद मंडलिक, सुनील आहिरे यांनी दोन दिवस पाहणी केली. या गावांना टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहेत. प्रस्ताव मंजूर होताच संबंधित गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. घुलेगाव व उंदीरवाडी, धुळगावसह १० वाड्यांचे पाणीटंचाईसंदर्भात नवीन टँकर मंजुरीचे आदेश मिळावे यासाठी तहसीलदारांकडे मागणी आलेली आहे. सध्या तालुक्यात असणारे डोंगरगाव, खिर्डीसाठे, सावरगाव येथे तीन लघु पाटबंधारे तलाव आहेत. परंतु ते पूर्णत: कोरडेठाक आहे. सध्या पाणीटंचाई असलेल्या गावांची मागणी आल्यानंतर महसूल व पंचायत समिती यांची संयुक्त पाहणी त्यानंतर प्रांताधिकारी द्वारा जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकर मंजुरीचा प्रस्ताव पाठविला जातो. यात किमान १२ ते १५ दिवसांचा कालावधी निघून जातो. टंचाईग्रस्त गावातील टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणी होत आहे. यामुळे पाणी टँकर मंजुरीसह टंचाईग्रस्त गावांना तत्काळ पाणी देण्याची व्यवस्था करता येईल. दररोज टँकरची एकच फेरी गावात होत असून, जनावरांनाही यातूनच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हा पाणीपुरवठा अपुरा ठरणार असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा उपलब्ध नाही. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न, शेतात वस्ती करून राहणाऱ्या व वस्ती म्हणून अधिकृत मान्यता नसलेल्या वस्त्यांना, शासनस्तरावरून पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे या शेतकऱ्यांना पाणी पातळी खोल गेलेल्या विहिरी व जागोजागी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्व्हची गळतीद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. यासाठी १ ते २ किमी अंतरावरूनही पाणी आणावे लागते़ (वार्ताहर)