शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:21 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात शहरातील अनेक व्यवसाय बंद असले तरी नाशिक महापालिकेच्या पाणी वापरात कोणतीही घट तर झाली नाहीच उलट एकूण मागणी केलेल्या पाणी आरक्षणाच्या ७३ टक्के पाणी आत्तापर्यंत वापरल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात शहरातील अनेक व्यवसाय बंद असले तरी नाशिक महापालिकेच्या पाणी वापरात कोणतीही घट तर झाली नाहीच उलट एकूण मागणी केलेल्या पाणी आरक्षणाच्या ७३ टक्के पाणी आत्तापर्यंत वापरल्याचे धक्कादायक वृत्त आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचा आटापिटा प्रशासनाला करावा लागणार आहे. त्यामुळे शहरात पाणीकपातीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या मागणीनुसार पाणी आरक्षणास जलसंपदा विभागाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे नव्या धोरणानुसार महापालिकेला आरक्षणाशिवाय पाणी वापरल्याने ज्यादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.शहराला गंगापूर धरण समूहाबरोबरच दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी पाणी आरक्षणाचे अधिकार पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे की जलसंपदा विभागाकडे यावर बराच खल झाल्यानंतर महापालिकेने पाच हजार दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदवली आहे. यात गंगापूर धरणातून ३६०० दशलक्ष घनफूट, दारणातून ४०० तर मुकणे धरणातून १००० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार पाणी आरक्षणाचा अधिकार जलसंपदा विभागाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविला आहे. त्यास अधिकृत मान्यता मिळाली नसली तरी महापालिकेने मंजुरीच्या अपेक्षेवर पाणी उचलणे सुरूच ठेवले आहे किंबहुना मान्यता मिळण्याच्या आतच ७३ टक्के पाणी वापरण्यात आले आहे.पाणी आरक्षण कालावधी २९० दिवसांपैकी गेल्या सोमवारअखेर (दि.४) म्हणजे २०३ दिवसांत महापालिकेने तब्बल ७३ टक्के वापरले आहे. एकूण ३ हजार ६३२ दशलक्ष घनफूट पाणी धरणांतून उचलण्यात आले आहे. मनपाने नोंदवलेल्या पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा विचार केला तर आता जेमतेम १३६८ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. हे पाणी आरक्षण ३१ जुलैपर्यंत म्हणजेच उर्वरित ८७ दिवस पुरवायचे आहे. त्यासाठी दररोज १५.७२ दशलक्ष घनफूट या दराने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. म्हणजेच पाणी पुरवून वापरण्यासाठी शहरात पाणीकपात करावी लागणार आहे.