शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:21 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात शहरातील अनेक व्यवसाय बंद असले तरी नाशिक महापालिकेच्या पाणी वापरात कोणतीही घट तर झाली नाहीच उलट एकूण मागणी केलेल्या पाणी आरक्षणाच्या ७३ टक्के पाणी आत्तापर्यंत वापरल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात शहरातील अनेक व्यवसाय बंद असले तरी नाशिक महापालिकेच्या पाणी वापरात कोणतीही घट तर झाली नाहीच उलट एकूण मागणी केलेल्या पाणी आरक्षणाच्या ७३ टक्के पाणी आत्तापर्यंत वापरल्याचे धक्कादायक वृत्त आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचा आटापिटा प्रशासनाला करावा लागणार आहे. त्यामुळे शहरात पाणीकपातीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या मागणीनुसार पाणी आरक्षणास जलसंपदा विभागाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे नव्या धोरणानुसार महापालिकेला आरक्षणाशिवाय पाणी वापरल्याने ज्यादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.शहराला गंगापूर धरण समूहाबरोबरच दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी पाणी आरक्षणाचे अधिकार पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे की जलसंपदा विभागाकडे यावर बराच खल झाल्यानंतर महापालिकेने पाच हजार दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदवली आहे. यात गंगापूर धरणातून ३६०० दशलक्ष घनफूट, दारणातून ४०० तर मुकणे धरणातून १००० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार पाणी आरक्षणाचा अधिकार जलसंपदा विभागाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविला आहे. त्यास अधिकृत मान्यता मिळाली नसली तरी महापालिकेने मंजुरीच्या अपेक्षेवर पाणी उचलणे सुरूच ठेवले आहे किंबहुना मान्यता मिळण्याच्या आतच ७३ टक्के पाणी वापरण्यात आले आहे.पाणी आरक्षण कालावधी २९० दिवसांपैकी गेल्या सोमवारअखेर (दि.४) म्हणजे २०३ दिवसांत महापालिकेने तब्बल ७३ टक्के वापरले आहे. एकूण ३ हजार ६३२ दशलक्ष घनफूट पाणी धरणांतून उचलण्यात आले आहे. मनपाने नोंदवलेल्या पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा विचार केला तर आता जेमतेम १३६८ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. हे पाणी आरक्षण ३१ जुलैपर्यंत म्हणजेच उर्वरित ८७ दिवस पुरवायचे आहे. त्यासाठी दररोज १५.७२ दशलक्ष घनफूट या दराने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. म्हणजेच पाणी पुरवून वापरण्यासाठी शहरात पाणीकपात करावी लागणार आहे.