शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

बागलाणच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 20:04 IST

खमताणे : बागलाण तालुक्यात कमी पाऊस झाल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता नागरिकांना भेडसावू लागली आहे. यंदा ना पाऊस, ना धान्य; अशी स्थिती निर्माण झाली आहे. विहीरी कोरड्या ठाक असुन, शेतीतील कूपनलिकामध्ये पाण्याचा थेंब ही शिल्लक नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

ठळक मुद्दे२२ गावातील पाडे, वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु

खमताणे : बागलाण तालुक्यात कमी पाऊस झाल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता नागरिकांना भेडसावू लागली आहे. यंदा ना पाऊस, ना धान्य; अशी स्थिती निर्माण झाली आहे. विहीरी कोरड्या ठाक असुन, शेतीतील कूपनलिकामध्ये पाण्याचा थेंब ही शिल्लक नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.यंदाचा दुष्काळ हा १९७२ पेक्षा भयावह असेल असे जुन्या जाणकारांकडून बोलले जात आहे. ग्रामीण भागात सर्वप्रथम आज पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या अनेक भागात निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये शासनाने टँकर पाणीपुरवठा केला असून, बºयाच ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात दिले आहे. परिसरातील बहुतांशी जलस्रोत आटले असुन, बरेच तलाव कोरडेठाक आहेत. शासनाने कोट्यवधी रु पये खर्च करून राबविले जलयुक्त शिवार यंदा कमी पावसामुळे शिवाराच्या शिवार ओस पडले आहे. अनेक शेतकºयांनी शेतीपिकात जनावरे सोडून दिल्याचे दिसते. त्यामुळे येणाºया काळात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे.तालुक्यात अनेक गावांमध्ये गावाला पाणीपुरवठा करणारी नळयोजना पाण्याअभावी बंद पडल्या असुन, तालुक्यातील खिरमाणी, चौगाव, इजमाणे, श्रीपुरवडे, भाक्षी, रामतीर, नवेगाव, पिंपळदर, आनंदपुर, टेंभे वरचे चिराई, राहुड, नळकस व आखतवाडे ही गावे ही लोणारवाडी व वघाणेपाडा अशा दोन वाड्यांना शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा होत असुन, तसेच खमताणे, तळवाडे, भामेर, जुनीशेमळी, भाक्षी, पारनेर, ढोलबारे, आव्हाटी, वनोली या आठ गावांनी शासनाच्या टॅकरसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविले आहे.ज्या गावांमधून पाण्याबाबत प्रस्ताव पाप्त होत आहे, त्याबाबत तालुक्यास्तरही समितीद्वारे सर्वेक्षण करून गरजेनुसार विहिर अधिग्रहण अथवा टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी पुरवठयÞाचे नियोजन करावे व नागरिकांनी पाण्याचा वापर जपुन करावा.- प्रमोद हिले, तहसीलदार, बागलाण.येणाºया काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांसह जनावरांसाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे. आमच्या अनेक शेतकºयांची पाणी व चाºयाअभावी जनावरे बाजारात कवडीमोल भावात विकले जातात.-हितेंद्र बागुल, शेतकरी.मुंजवाड परिसरात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यातच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.- वैभव बागुल, शेतकरी, खमताणे.