शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाणीटंचाई पाचवीला पुजलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:03 IST

लासलगांव : धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दूर्लक्ष्यामुळे आणि सतत होणाºया वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देधरण उशाशी कोरड घशाशी अशी सध्या अवस्था

लासलगांव : धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दूर्लक्ष्यामुळे आणि सतत होणाºया वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पालकमंत्री भुजबळ यांच्या मतदार संघातील लासलगाव या मोठ्या गावी वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ही लासलगाव सह सोळा पाणी योजना झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचे वरीष्ठ अधिकारी आता या योजनेशी आपल काहीच संबंध नाही अशा अविर्भावात वागत आहेत.लासलगावला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मध्यमेश्वर येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक्सप्रेस फिडर बसवले असून तरीदेखील दिवसातून अनेक वेळा सदर लाईन ट्रीप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.या योजनेला एक्सप्रेस फिडर बसवले असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे कोणतीही कारण नसते पण वीज वितरण अधिकारी वारंवार वीज पुरवठा खंडित करतात त्यामुळे संपूर्ण योजनेचे पाणी पुरवठा विस्कळीत होतो.यासंदर्भात निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे विचारणा केली असता त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांची यासंदर्भात त्वरित बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.सध्या पाण्याचा मुबलक वापर मोठ्या प्रमाणात होत असताना वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे लासलगावकरांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.