शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:47 IST

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांची वानवा : नदीपात्र कोरडेठाक पडल्याने जनावरेही पाण्यापासून वंचित

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.तालुक्यात जवळपास २०० गावे-वाड्या असून, पैकी दरवर्षी १०० वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात परिसरात मोेठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी सिंचन प्रकल्पांची वानवा असल्याने उन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची दयनीय अवस्था तालुक्यात पहावयास मिळते.तालुक्यात लहान-मोठी अशी आठ धरणे आहेत; मात्र त्यांची क्षमता कमी असल्याने सिंचनक्षेत्रही त्याच मर्यादेत येत असल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यावर्षी पेठ तालुक्याची पावसाची सरासरी समाधानकारक दिसत असली तरीही प्रारंभीच्या काळात पडलेला पाऊस शेवटपर्यंत टिकून न राहिल्याने खरिपाची पिके वाया जाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी रानातून गावातील घरी आणावे लागते. भीषण पाणीटंचाईमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, गावे ओस पडू लागली आहेत. सध्या निवडणुकांचा धुराळा उडत असल्याने राजकारण्यांचे पाणी व रोजगारापेक्षा निवडणुकांकडे अधिक लक्ष लागून असल्याने सध्या तरी केवळ प्रशासनावर टंचाई निवारणाची भिस्त आहे. आदिवासी भागातील वाडी-वस्तीवर भीषण पाणीटंचाईमुळे स्थलांतर करण्याची नागरिकांवर वेळ आली असून, शासन टंचाई निवारणासाठी करीत असलेल्या अपूर्ण उपाययोजना व नियोजनाचा अभाव यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमसारख्या सामाजिक संस्थांनी आपला हात पुढे केला आहे. शासन अनुदानातून रखडलेल्या पाणी योजना लोकसहभागातून पूर्णत्वास नेऊन सोशल नेटवर्किंग फोरमने आदिवासी भागातील जवळपास ११ गावे टंचाईच्या कचाट्यातून मुक्त केली आहेत. तसेच आपुलकी सामाजिक सेवाभावी ग्रुपच्या वतीने गावांना व शाळांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करून या टंचाईच्या झळांपासून नागरिकांना मुक्त करण्याचे काम केले आहे.पेठ तालुक्यात आठ लघुसिंचन प्रकल्प असले तरी त्यापैकी हरणगाव व इनामबारी या दोन धरणांतून कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बाकी छोट्या धरणांचे पाणी उन्हाळ्यात नदीपात्रात सोडल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांना जीवदान मिळू शकेल. सध्या नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने जनावरांचा पाणीप्रश्न बिकट झाल्याने त्यांनाही पाण्याची उपलब्धता होऊ शकेल म्हणून किमान दोन-तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.