शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:47 IST

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांची वानवा : नदीपात्र कोरडेठाक पडल्याने जनावरेही पाण्यापासून वंचित

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.तालुक्यात जवळपास २०० गावे-वाड्या असून, पैकी दरवर्षी १०० वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात परिसरात मोेठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी सिंचन प्रकल्पांची वानवा असल्याने उन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची दयनीय अवस्था तालुक्यात पहावयास मिळते.तालुक्यात लहान-मोठी अशी आठ धरणे आहेत; मात्र त्यांची क्षमता कमी असल्याने सिंचनक्षेत्रही त्याच मर्यादेत येत असल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यावर्षी पेठ तालुक्याची पावसाची सरासरी समाधानकारक दिसत असली तरीही प्रारंभीच्या काळात पडलेला पाऊस शेवटपर्यंत टिकून न राहिल्याने खरिपाची पिके वाया जाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी रानातून गावातील घरी आणावे लागते. भीषण पाणीटंचाईमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, गावे ओस पडू लागली आहेत. सध्या निवडणुकांचा धुराळा उडत असल्याने राजकारण्यांचे पाणी व रोजगारापेक्षा निवडणुकांकडे अधिक लक्ष लागून असल्याने सध्या तरी केवळ प्रशासनावर टंचाई निवारणाची भिस्त आहे. आदिवासी भागातील वाडी-वस्तीवर भीषण पाणीटंचाईमुळे स्थलांतर करण्याची नागरिकांवर वेळ आली असून, शासन टंचाई निवारणासाठी करीत असलेल्या अपूर्ण उपाययोजना व नियोजनाचा अभाव यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमसारख्या सामाजिक संस्थांनी आपला हात पुढे केला आहे. शासन अनुदानातून रखडलेल्या पाणी योजना लोकसहभागातून पूर्णत्वास नेऊन सोशल नेटवर्किंग फोरमने आदिवासी भागातील जवळपास ११ गावे टंचाईच्या कचाट्यातून मुक्त केली आहेत. तसेच आपुलकी सामाजिक सेवाभावी ग्रुपच्या वतीने गावांना व शाळांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करून या टंचाईच्या झळांपासून नागरिकांना मुक्त करण्याचे काम केले आहे.पेठ तालुक्यात आठ लघुसिंचन प्रकल्प असले तरी त्यापैकी हरणगाव व इनामबारी या दोन धरणांतून कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बाकी छोट्या धरणांचे पाणी उन्हाळ्यात नदीपात्रात सोडल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांना जीवदान मिळू शकेल. सध्या नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने जनावरांचा पाणीप्रश्न बिकट झाल्याने त्यांनाही पाण्याची उपलब्धता होऊ शकेल म्हणून किमान दोन-तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.