शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

पेठच्या १०० वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:47 IST

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांची वानवा : नदीपात्र कोरडेठाक पडल्याने जनावरेही पाण्यापासून वंचित

पेठ : एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागल्याने पेठ तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.तालुक्यात जवळपास २०० गावे-वाड्या असून, पैकी दरवर्षी १०० वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात परिसरात मोेठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी सिंचन प्रकल्पांची वानवा असल्याने उन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची दयनीय अवस्था तालुक्यात पहावयास मिळते.तालुक्यात लहान-मोठी अशी आठ धरणे आहेत; मात्र त्यांची क्षमता कमी असल्याने सिंचनक्षेत्रही त्याच मर्यादेत येत असल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यावर्षी पेठ तालुक्याची पावसाची सरासरी समाधानकारक दिसत असली तरीही प्रारंभीच्या काळात पडलेला पाऊस शेवटपर्यंत टिकून न राहिल्याने खरिपाची पिके वाया जाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नदीपात्र कोरडे पडत असल्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी रानातून गावातील घरी आणावे लागते. भीषण पाणीटंचाईमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, गावे ओस पडू लागली आहेत. सध्या निवडणुकांचा धुराळा उडत असल्याने राजकारण्यांचे पाणी व रोजगारापेक्षा निवडणुकांकडे अधिक लक्ष लागून असल्याने सध्या तरी केवळ प्रशासनावर टंचाई निवारणाची भिस्त आहे. आदिवासी भागातील वाडी-वस्तीवर भीषण पाणीटंचाईमुळे स्थलांतर करण्याची नागरिकांवर वेळ आली असून, शासन टंचाई निवारणासाठी करीत असलेल्या अपूर्ण उपाययोजना व नियोजनाचा अभाव यामुळे अनेक गावांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमसारख्या सामाजिक संस्थांनी आपला हात पुढे केला आहे. शासन अनुदानातून रखडलेल्या पाणी योजना लोकसहभागातून पूर्णत्वास नेऊन सोशल नेटवर्किंग फोरमने आदिवासी भागातील जवळपास ११ गावे टंचाईच्या कचाट्यातून मुक्त केली आहेत. तसेच आपुलकी सामाजिक सेवाभावी ग्रुपच्या वतीने गावांना व शाळांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करून या टंचाईच्या झळांपासून नागरिकांना मुक्त करण्याचे काम केले आहे.पेठ तालुक्यात आठ लघुसिंचन प्रकल्प असले तरी त्यापैकी हरणगाव व इनामबारी या दोन धरणांतून कॅनॉलद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. बाकी छोट्या धरणांचे पाणी उन्हाळ्यात नदीपात्रात सोडल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांना जीवदान मिळू शकेल. सध्या नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने जनावरांचा पाणीप्रश्न बिकट झाल्याने त्यांनाही पाण्याची उपलब्धता होऊ शकेल म्हणून किमान दोन-तीन वेळा नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.