शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
5
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
6
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
7
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
8
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
9
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
10
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
11
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
12
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
13
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
14
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
15
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
16
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
17
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
18
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
19
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
20
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'

पाणीप्रश्नी महासभेत सरकारविरोधी ‘संतप्तधार’

By admin | Updated: November 7, 2015 21:35 IST

सर्व पक्ष एकवटले : उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करणार

नाशिक : ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, असा गजर करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीप्रश्नी महापालिकेने तातडीने बोलाविलेल्या विशेष महासभेत पालकमंत्र्यांसह स्थानिक भाजपा आमदार आणि राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नाशिककरांना झोपेत ठेवत गंगापूर धरण समूहातून मराठवाड्यातील पाणी पळविल्याबद्दल तब्बल साडेपाच तास चाललेल्या चर्चेत सरकारविरोधी ‘संतप्तधार’ बरसली आणि सुलतानी आक्रमणाचा तिखट शब्दांत निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारने त्वरित पाण्याचा विसर्ग थांबवावा, अन्यथा कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात येईल; शिवाय उच्च न्यायालयात मनपामार्फत फेरयाचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात आला.गंगापूर धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध महापौर अशोक मुर्तडक यांनी बोलाविलेल्या विशेष महासभेत सुमारे ४० नगरसेवकांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासह पालकमंत्री, भाजपाचे पाचही स्थानिक आमदार आणि राज्य सरकारवर संतापाच्या तोफा डागल्या. यावेळी भाजपा आमदारांच्या मानापमान नाट्यावरही सदस्यांनी तोंडसुख घेतले. सन २००५ मध्ये झालेल्या कायद्यानुसार समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणावर सदस्यांनी जोरदार हल्ला चढवित सांगितले, या पाणीवाटपाच्या धोरणातून गंगापूर धरण समूहाला तातडीने वगळण्यात यावे. जलसंपत्ती प्राधिकरणपुढे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चुकीची आकडेवारी दिल्याने जलसंकट उभे राहिले आहे. नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळविण्याची कुणीतरी सुपारी वाजविली असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. उच्च न्यायालयाने फक्त पिण्यासाठीच पाणी सोडण्याचे निर्देश दिले असताना मराठवाड्यातील शेती, तसेच मद्य कारखान्यांसाठीच हा पाणी पळविण्याचा घाट घातला गेला आहे. सदर पाणी गेल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे सुमारे १५०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. या सुलतानी आक्रमणामुळे शेतकऱ्यांची पुढची पिढी आत्महत्त्या नव्हे तर हत्त्या करतील, असा इशारा देण्यात आला. यानंतर महापौरांनी मनपाला प्राधिकरणपुढे बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. प्राधिकरणनने नैसर्गिक न्यायाची पायमल्ली केली आहे. पिण्याच्या नावाखाली शेती व मद्य कारखान्यांना पाणी दिले जात असेल, तर नाशिककर गप्प बसणार नाहीत. राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करत उरलेले पाणी तरी थांबवावे. सरकारने दखल न घेतल्यास सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने नागरिकांना सहभागी करून घेत व्यापक आंदोलन छेडले जाईल. मनपा प्रशासनानेही जलतज्ज्ञांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी. सभागृहातील सर्व सूचनांचा समावेश करत एक सर्वसमावेशक ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)