शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

पाण्याचे आवर्तन रोखले

By admin | Updated: November 24, 2015 21:51 IST

सटाणा : मुंगसे, पिंगळवाडेतील ग्रामस्थांनी केले दरवाजे बंद

सटाणा : गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या बागलाण तालुक्यातील करंजाडी खोऱ्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाखोड लघुप्रकल्पामधून पिण्यासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोमवारी रात्री सोडले; मात्र मंगळवारी पहाटे मुंगसे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी दरवाजे बंद करून पाण्याचे आवर्तन रोखल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी पाणी सोडण्याचे चाक पळवून नेल्याने तणाव निर्माण झाला असून, मुंगसे, पिंगळवाडे विरुद्ध सात गावे असा तीव्र संघर्ष पेटला आहे. सात गावांच्या सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या जमावाने मंगळवारी दुपारी जायखेडा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत आवर्तन रोखणाऱ्यांना अटक करा, अशी ठाम भूमिका घेत आठ तास ठिय्या दिल्याने जाखोडचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.पाण्यासाठी संपूर्ण खोरे टाहो फोडत असताना, या दरम्यानच मुंगसे व पिंगळवाडे ग्रामस्थांनी पाण्याचे आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्याची मागणी करून या आवर्तनाला तीव्र विरोध केला होता. परंतु टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाखोड लघुप्रकल्पामधून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जलसंपदा विभागाने प्रकल्पाचा दरवाजा खोलून पाण्याचे आवर्तन सोडले; मात्र मंगळवारी पहाटे काही ग्रामस्थांनी प्रकल्पाचा दरवाजा बंद करून आवर्तन रोखत चाक पळवून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. आवर्तनाचे पाणी करंजाडपर्यंत पोहचले होते. मात्र अचानक पाणी बंद झाल्याने करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या जमावाने काल दुपारी उपाशीपोटी जायखेडा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करून आवर्तन रोखणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी सकाळी दहा वाजेपासून पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिला. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. अखेर दुपारी साडेचार वाजता सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी अज्ञात तीस ते चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अशोक काकुळते, निकम यांनी सायंकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा यावेळी निर्णय घेतला. आंदोलनात संजय देवरे, राहुल पाटील, वसंत पवार, दिलीप शेवाळे, राकेश देवरे, बापू देवरे, बळीराम जाधव यांच्यासह चारशे ते पाचशे ग्रामस्थ सहभागी झाले होते़ (वार्ताहर)