शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज; आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

पाण्याचे आवर्तन रोखले

By admin | Updated: November 24, 2015 21:51 IST

सटाणा : मुंगसे, पिंगळवाडेतील ग्रामस्थांनी केले दरवाजे बंद

सटाणा : गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेल्या बागलाण तालुक्यातील करंजाडी खोऱ्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाखोड लघुप्रकल्पामधून पिण्यासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोमवारी रात्री सोडले; मात्र मंगळवारी पहाटे मुंगसे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी दरवाजे बंद करून पाण्याचे आवर्तन रोखल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी पाणी सोडण्याचे चाक पळवून नेल्याने तणाव निर्माण झाला असून, मुंगसे, पिंगळवाडे विरुद्ध सात गावे असा तीव्र संघर्ष पेटला आहे. सात गावांच्या सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या जमावाने मंगळवारी दुपारी जायखेडा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत आवर्तन रोखणाऱ्यांना अटक करा, अशी ठाम भूमिका घेत आठ तास ठिय्या दिल्याने जाखोडचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.पाण्यासाठी संपूर्ण खोरे टाहो फोडत असताना, या दरम्यानच मुंगसे व पिंगळवाडे ग्रामस्थांनी पाण्याचे आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्याची मागणी करून या आवर्तनाला तीव्र विरोध केला होता. परंतु टंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाखोड लघुप्रकल्पामधून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जलसंपदा विभागाने प्रकल्पाचा दरवाजा खोलून पाण्याचे आवर्तन सोडले; मात्र मंगळवारी पहाटे काही ग्रामस्थांनी प्रकल्पाचा दरवाजा बंद करून आवर्तन रोखत चाक पळवून नेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. आवर्तनाचे पाणी करंजाडपर्यंत पोहचले होते. मात्र अचानक पाणी बंद झाल्याने करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सुमारे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या जमावाने काल दुपारी उपाशीपोटी जायखेडा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करून आवर्तन रोखणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी सकाळी दहा वाजेपासून पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिला. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. अखेर दुपारी साडेचार वाजता सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी अज्ञात तीस ते चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अशोक काकुळते, निकम यांनी सायंकाळी सहा वाजता पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचा यावेळी निर्णय घेतला. आंदोलनात संजय देवरे, राहुल पाटील, वसंत पवार, दिलीप शेवाळे, राकेश देवरे, बापू देवरे, बळीराम जाधव यांच्यासह चारशे ते पाचशे ग्रामस्थ सहभागी झाले होते़ (वार्ताहर)