शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
3
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
4
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
5
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
6
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
7
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
8
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
9
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
10
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
11
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
12
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
13
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
14
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
15
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
16
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
17
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
18
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
19
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
20
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

चणकापूरमधून उजव्या कालव्याला पाणी

By admin | Updated: February 6, 2016 22:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : पुढील आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन

कळवण : चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत तसेच या कालव्याद्वारे भेंडी पाझर तलाव भरून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळवण व देवळा तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले. सध्या भेंडीगाव दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीप्रश्नासंदर्भात कळवण येथे भेंडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेत याबाबत तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून भेंडी व परिसरातील पाणीप्रश्नाकडे यंत्रणेचे लक्ष वेधले.दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन चालू असून, पाटबंधारे विभागाने याबाबत अहवाल दिला आहे. भविष्यातील पाणी मागणीचा विचार करून नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.चणकापूर उजवा कालव्यात पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरणे व पाणीप्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत लाभक्षेत्रातील कळवण, देवळा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान चणकापूर धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती प्रवीण रौंदळ, विलास रौंदळ यांनी दिली.चणकापूर उजवा कालव्याला पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व सदस्य नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत गुरुवारी पुन्हा या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी केली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, वसंत मोरे, प्रभाकर सोनवणे, बापू रौंदळ, भाऊसाहेब रौंदळ, तुषार रौंदळ, निवृत्ती रौंदळ, यशवंत देवरे, बापू देवरे, अमोल देवरे, शैलेश देवरे, संजय गायकवाड, दिनेश मोरे आदिंसह भेंडी, निवाणे, वाजगाव येथील शेतकऱ्यांचा सहभाग होता.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतीसाठी आवर्तन सोडून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे यांनी केली आहे.