शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

चणकापूरमधून उजव्या कालव्याला पाणी

By admin | Updated: February 6, 2016 22:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : पुढील आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन

कळवण : चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत तसेच या कालव्याद्वारे भेंडी पाझर तलाव भरून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळवण व देवळा तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले. सध्या भेंडीगाव दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीप्रश्नासंदर्भात कळवण येथे भेंडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेत याबाबत तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून भेंडी व परिसरातील पाणीप्रश्नाकडे यंत्रणेचे लक्ष वेधले.दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन चालू असून, पाटबंधारे विभागाने याबाबत अहवाल दिला आहे. भविष्यातील पाणी मागणीचा विचार करून नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.चणकापूर उजवा कालव्यात पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरणे व पाणीप्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत लाभक्षेत्रातील कळवण, देवळा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान चणकापूर धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती प्रवीण रौंदळ, विलास रौंदळ यांनी दिली.चणकापूर उजवा कालव्याला पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व सदस्य नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत गुरुवारी पुन्हा या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी केली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, वसंत मोरे, प्रभाकर सोनवणे, बापू रौंदळ, भाऊसाहेब रौंदळ, तुषार रौंदळ, निवृत्ती रौंदळ, यशवंत देवरे, बापू देवरे, अमोल देवरे, शैलेश देवरे, संजय गायकवाड, दिनेश मोरे आदिंसह भेंडी, निवाणे, वाजगाव येथील शेतकऱ्यांचा सहभाग होता.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतीसाठी आवर्तन सोडून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे यांनी केली आहे.