शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूरमधून उजव्या कालव्याला पाणी

By admin | Updated: February 6, 2016 22:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : पुढील आठवड्यात पाणी सोडण्याचे नियोजन

कळवण : चणकापूर प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत तसेच या कालव्याद्वारे भेंडी पाझर तलाव भरून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी कळवण व देवळा तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले. सध्या भेंडीगाव दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करत असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीप्रश्नासंदर्भात कळवण येथे भेंडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय यंत्रणेने याची दखल घेत याबाबत तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठवून भेंडी व परिसरातील पाणीप्रश्नाकडे यंत्रणेचे लक्ष वेधले.दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन चालू असून, पाटबंधारे विभागाने याबाबत अहवाल दिला आहे. भविष्यातील पाणी मागणीचा विचार करून नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.चणकापूर उजवा कालव्यात पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरणे व पाणीप्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत लाभक्षेत्रातील कळवण, देवळा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी दि. १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान चणकापूर धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती प्रवीण रौंदळ, विलास रौंदळ यांनी दिली.चणकापूर उजवा कालव्याला पाणी सोडून भेंडी पाझर तलाव भरावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व सदस्य नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत गुरुवारी पुन्हा या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणी केली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, वसंत मोरे, प्रभाकर सोनवणे, बापू रौंदळ, भाऊसाहेब रौंदळ, तुषार रौंदळ, निवृत्ती रौंदळ, यशवंत देवरे, बापू देवरे, अमोल देवरे, शैलेश देवरे, संजय गायकवाड, दिनेश मोरे आदिंसह भेंडी, निवाणे, वाजगाव येथील शेतकऱ्यांचा सहभाग होता.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतीसाठी आवर्तन सोडून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे यांनी केली आहे.